मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. गुलाबराव घोरपडे यांचे निधन अत्यंत धक्कादायक व मनाला वेदना देणारी घटना आहे. घोरपडे हे काँग्रेस विचारांचे पाईक होते, शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काँग्रेसचा विचार सोडला नाही. घोरपडे यांच्या निधनाने काँग्रेसने एक निष्ठावान कार्यकर्ता गमावला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.
अॅड. गुलाबराव घोपरडे यांनी कोल्हापुर जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. मननिळावू स्वभाव, दांगडा जनसंपर्क व जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर असणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. घोरपडे यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षपद दहा वर्ष भुषवले, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निरीक्षक अशा विविध पदांवर ते कार्यरत होते. त्यांच्या अकाली जाण्याने कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच काँग्रेस कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे.
अॅड. गुलाबराव घोरपडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी घोरपडे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
ठाणे: उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत केवळ कृषीपुरते मर्यादित न राहता “इंटिग्रेटेड…
ठाणे: जवळपास 9500 विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या 59 ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला भेट…
मुंबई: मुंबई महानगरपालिका चे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील कथित अनियमितता व संभाव्य…
मुंबई: विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पुणे येथील आय.एल.एस. विधी महाविद्यालयातील बेकायदेशीर शुल्क वसुली प्रकरणी…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथील सालकरमळा परिसरात शेतीच्या नांगरणीवरून दोन गटांमध्ये वाद होऊन…
शिरूर (अरुणकुमार मोटे): पोटगीच्या वादातून संतापाच्या भरात पतीने पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना…