महाराष्ट्र

अजित पवारांनंतर सत्तासंतुलन ढासळलं; सुनेत्रा पवारांसमोर चार मोठी आव्हान

मुंबई: अजित पवारांच्या आकस्मिक निधनानंतर केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सत्तेचा समतोल पुन्हा स्थिर होण्यासाठी वेळ लागणार असतानाच, या परिस्थितीत महायुती सरकारने अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महिलेकडे उपमुख्यमंत्रीपद आलं आहे.

हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असला तरी, सुनेत्रा पवारांसमोरची वाट सोपी नाही. राजकारणाच्या मुख्य प्रवाहात अलीकडेच प्रवेश केलेल्या सुनेत्रा पवारांना आता थेट राज्याच्या सत्तेतील क्रमांक दोनचं पद सांभाळावं लागणार आहे.

प्रशासकीय अनुभवाचा अभाव

सुनेत्रा पवार या जून २०२४ मध्ये खासदार झाल्या. संसदेतील काही समित्यांवर काम करण्याव्यतिरिक्त त्यांना प्रत्यक्ष प्रशासकीय अनुभव नाही. मंत्रालयीन कामकाज, खात्यांचा कारभार, अधिकाऱ्यांशी समन्वय, विधिमंडळातील भूमिका—हे सगळं त्यांच्या दृष्टीने नवीन असणार आहे. चार दशकांचा अनुभव असलेल्या अजित पवारांनंतर ही उणीव प्रकर्षाने जाणवते.

पक्षसंघटना हाताळण्याचं आव्हान

सरकारसोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय सूत्रंही अप्रत्यक्षपणे सुनेत्रा पवारांनाच सांभाळावी लागणार आहेत. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे यांसारखे अनुभवी नेते असलेल्या पक्षात स्वतःचं नेतृत्व सिद्ध करणं ही मोठी कसोटी असेल. आमदारांची निष्ठा टिकवणं आणि पक्षयंत्रणा नियंत्रणात ठेवणं हेही आव्हान आहे.

मित्रपक्षांशी नाजूक संबंध

महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यासोबतचं सत्तासंतुलन राखणं हा सध्या सर्वात संवेदनशील मुद्दा आहे. अजित पवारांनी फडणवीस, शिंदे आणि दिल्लीतील नेतृत्वासोबत तयार केलेले संबंध कायम ठेवण्याची जबाबदारी आता सुनेत्रा पवारांवर आहे. स्थानिक पातळीवरील आघाड्यांचं राजकारणही पुढे चालू ठेवावं लागणार आहे.

पवार कुटुंब आणि राष्ट्रवादीचं भविष्य

शरद पवार आणि अजित पवार गटातील राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला असतानाच हा मोठा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर पवार कुटुंब, पक्षाचं विलिनीकरण आणि नेतृत्वाचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. या सगळ्यात सुनेत्रा पवारांची भूमिका मध्यवर्ती ठरणार आहे.अकस्मातपणे आलेली सत्ता, वैयक्तिक दुःख आणि राजकीय जबाबदारी—या तिहेरी परीक्षेतून सुनेत्रा पवार कशा मार्ग काढतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आनंदआश्रमात गुरुपौर्णिमेचा उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…

60 मिनिटे ago

अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…

1 तास ago

धुराची आग लावणाऱ्यांनाच आता धुराची अॅलर्जी!

मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…

1 तास ago

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

17 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

19 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

2 दिवस ago