महाराष्ट्र

अजित पवारांनंतर सत्तासंतुलन ढासळलं; सुनेत्रा पवारांसमोर चार मोठी आव्हान

मुंबई: अजित पवारांच्या आकस्मिक निधनानंतर केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सत्तेचा समतोल पुन्हा स्थिर होण्यासाठी वेळ लागणार असतानाच, या परिस्थितीत महायुती सरकारने अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महिलेकडे उपमुख्यमंत्रीपद आलं आहे.

हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असला तरी, सुनेत्रा पवारांसमोरची वाट सोपी नाही. राजकारणाच्या मुख्य प्रवाहात अलीकडेच प्रवेश केलेल्या सुनेत्रा पवारांना आता थेट राज्याच्या सत्तेतील क्रमांक दोनचं पद सांभाळावं लागणार आहे.

प्रशासकीय अनुभवाचा अभाव

सुनेत्रा पवार या जून २०२४ मध्ये खासदार झाल्या. संसदेतील काही समित्यांवर काम करण्याव्यतिरिक्त त्यांना प्रत्यक्ष प्रशासकीय अनुभव नाही. मंत्रालयीन कामकाज, खात्यांचा कारभार, अधिकाऱ्यांशी समन्वय, विधिमंडळातील भूमिका—हे सगळं त्यांच्या दृष्टीने नवीन असणार आहे. चार दशकांचा अनुभव असलेल्या अजित पवारांनंतर ही उणीव प्रकर्षाने जाणवते.

पक्षसंघटना हाताळण्याचं आव्हान

सरकारसोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय सूत्रंही अप्रत्यक्षपणे सुनेत्रा पवारांनाच सांभाळावी लागणार आहेत. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे यांसारखे अनुभवी नेते असलेल्या पक्षात स्वतःचं नेतृत्व सिद्ध करणं ही मोठी कसोटी असेल. आमदारांची निष्ठा टिकवणं आणि पक्षयंत्रणा नियंत्रणात ठेवणं हेही आव्हान आहे.

मित्रपक्षांशी नाजूक संबंध

महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यासोबतचं सत्तासंतुलन राखणं हा सध्या सर्वात संवेदनशील मुद्दा आहे. अजित पवारांनी फडणवीस, शिंदे आणि दिल्लीतील नेतृत्वासोबत तयार केलेले संबंध कायम ठेवण्याची जबाबदारी आता सुनेत्रा पवारांवर आहे. स्थानिक पातळीवरील आघाड्यांचं राजकारणही पुढे चालू ठेवावं लागणार आहे.

पवार कुटुंब आणि राष्ट्रवादीचं भविष्य

शरद पवार आणि अजित पवार गटातील राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला असतानाच हा मोठा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर पवार कुटुंब, पक्षाचं विलिनीकरण आणि नेतृत्वाचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. या सगळ्यात सुनेत्रा पवारांची भूमिका मध्यवर्ती ठरणार आहे.अकस्मातपणे आलेली सत्ता, वैयक्तिक दुःख आणि राजकीय जबाबदारी—या तिहेरी परीक्षेतून सुनेत्रा पवार कशा मार्ग काढतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

3 तास ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

7 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

7 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

7 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

7 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

10 तास ago