महाराष्ट्र

मुलीसाठी वडिलांनी घर विकलं, आज तिच्या जाण्याने मन सुन्न झालं

पिंकी माळींच्या कुटुंबाला भेटल्यानंतर रोहित पवार भावुक

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह वैमानिक आणि क्रू-मेंबर पिंकी माळी यांच्यासह एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी मृत क्रू-मेंबर पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची मुंबईत भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

या भेटीनंतर रोहित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “एका टॅक्सी चालकाने आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी स्वतःची खोली विकली, तिला मोठं केलं आणि ती मुलगी घराची जबाबदारी समर्थपणे पेलू लागली असतानाच काळाने तिच्यावर झडप घातली. हे सगळं पाहून मन सुन्न झालं आहे.”

पिंकी माळी यांचे वडील मुंबईत टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मुलीला उच्च शिक्षण मिळावं आणि तिचं करिअर घडावं यासाठी त्यांनी आपले राहते घरही विकले होते. पिंकीने अनेक नामांकित कंपन्यांमध्ये काम करून आपल्या वडिलांच्या कष्टाचे चीज केले. घराची आर्थिक परिस्थिती सावरत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली, असेही रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, पिंकी माळी यांचा भाऊ सध्या शिक्षण घेत असून त्याच्या भवितव्याबाबत रोहित पवार यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. “कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेता त्याच्या नोकरीसाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी परिवार या कुटुंबाच्या सोबत ठामपणे उभा आहे,” असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

यावेळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबाबत विचारले असता रोहित पवार म्हणाले, “सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली याचा आनंद आहे. मात्र सध्या संपूर्ण पवार कुटुंब आणि महाराष्ट्र दुःखात आहे. अशा वेळी राजकारणापेक्षा माणुसकी महत्त्वाची आहे. दादांच्या जागी आम्ही आजही सुनेत्रा वहिनींनाच पाहतो.”

तसेच राजकीय विलीनीकरण आणि वादांवर सध्या बोलणे टाळत रोहित पवार यांनी सांगितले की, “सध्या केवळ सांत्वन आणि मदतीला प्राधान्य आहे. राजकीय विषयांवर मी १३ दिवसांनंतरच बोलेन.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आनंदआश्रमात गुरुपौर्णिमेचा उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…

1 तास ago

अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…

1 तास ago

धुराची आग लावणाऱ्यांनाच आता धुराची अॅलर्जी!

मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…

1 तास ago

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

17 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

19 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

2 दिवस ago