महाराष्ट्र

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे एकही शब्द न बोलता महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

मुंबई: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि वाद हे जणू समिकरणच बनलंय की काय? अशी चर्चा आता सुरू झाली. कारण जेव्हा जेव्हा माणिकराव कोकाटे बोलतात तेव्हा तेव्हा वाद निर्माण झाला असं समजाच.

दरम्यान आता कोकाटे बोलले देखील नाहीत, तरीही मोठा वाद निर्माण झालाय. माणिकराव कोकाटेंच्या एका कृतीमुळे राज्यात चांगलंच राजकारण पेटलंय माणिकराव कोकाटेंचा विधिमंडळात रमी खेळतानाचा एक व्हिडिओ शऱद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी ट्विट केलाय. यानंतर माणिकराव कोकाटेंवर चहू बाजूंनी टीकेची झोड उठतेय.

सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असतानासुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीकविमा-कर्जमाफी-भावांतरची मागणी करणा-या शेतक-यांची ‘कभी गरीब किसानों कीं खेतीपर भी आओ ना महाराज’ ही आर्त हाक ऐकू येईल का? रोहित पवारांनी व्हिडिओ ट्विट केल्यानंतर विरोधकांनी कोकाटेंवर चांगलीच आगपाखड केलीय.

राज्यात 650 शेतक-यांनी आत्महत्या केलीय.. मात्र, कृषीमंत्री रमी खेळण्यात व्यक्त असल्याची टीका राऊतांनी केलीय. तर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांनी मात्र, कोकाटेंचं समर्थन करताना एक अजब वक्तव्य केलंय. माणिकराव कोकाटे पहिल्यांदा वादात सापडले नाहीयेत. या आधीही अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यासह त्यांच्या पक्षाची कोंडी झालीय. मात्र, पुन्हा एकदा कोकाटे वादात सापडले आहेत. त्यामुळे विरोधकांना देखील त्यांच्यावर टीका करण्याची आयती संधीच मिळाली आहे.

काँग्रेसनं देखील माणिकराव कोकाटेंना धारेवर धरलंय. शेतकरी मरतोय आणि कृषीमंत्री रमी खेळतोय असं म्हणत वडेट्टीवारांनी त्याचा खरपूस समाचार घेतला. तर येड्यांची जत्रा आणि पेढ्यांचा पाऊस अशी मंत्रिमंडळाची अवस्था झाल्याचा हल्लाबोल सुषमा अंधारेंनी केला आहे. दरम्यान या सर्व वादावर माणिकराव कोकाटेंनी स्पष्टीकरण दिलंय.मोबाईलवर रमीची जाहिरात आली होती ती स्कीप करतानाचा तो व्हिडिओ आहे. तसंच माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप देखील माणिकराव कोकाटेंनी केला आहे.

जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी लोकप्रतिनिधींना लोकशाहिच्या मंदिरात पाठवलं जात. त्याच लोकशाहीच्या मंदिरात मंत्री रमी खेळत असतील तर जनतेनं कोणाकडून अपेक्षा करायच्यात. राज्यात शेतक-यांना खतं मिळत नाहीयेत. कुठे पाऊस न पडल्यामुळे शेतक-यांवर दुबार पेरणीची वेळ आलीय. तर कुठे शेतकरी आत्महत्या करतोय. मात्र, राज्याचे कृषीमंत्र्यांचं याकडे लक्ष नसून ते विधिमंडळात रमी खेळण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे माय-बाप शेतक-यांनी कुणाकडून अपेक्षा करायच्यात असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत पारदर्शकता राखा; विभागनिहाय कार्यशाळा घ्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई: ‘व्हीबी-जी राम जी’ (विकसित भारत-ग्रामीण रोजगार व आजीविका मिशन) योजनेची अंमलबजावणी शासनापासून गावपातळीपर्यंत पूर्ण…

14 तास ago

भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

वैजापूरच्या शेतकरी मेळाव्यात मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल; शेतकरी, महागाई, बेरोजगारी आणि स्मार्ट मीटरवरून टीका मुंबई:…

15 तास ago

शिरूर! निमगाव म्हाळुंगीमध्ये जन्मदात्या मुलाकडून आईची हत्या…

शिरूर : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे ६० वर्षीय महिलेचा मारहाण करून खून झाल्याची धक्कादायक…

17 तास ago

‘महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा’च्या चर्चा अफवा; शिंदे ‘चोरीचा माल’ घेऊन शाहांकडे गेले; संजय राऊत

रामरक्षा आंदोलन, राष्ट्रवादी-एनडीए चर्चांपासून ते शिंदे-शाह भेटीपर्यंत अनेक मुद्द्यांवर राऊतांची सडेतोड प्रतिक्रिया   नागपूर: 18…

21 तास ago

Video: शिरूर तालुक्यात स्वीट होममधील कामगाराला बेदम मारहाण…

शिरूर (तेजस फडके): समोसे देण्याच्या कारणावरुन झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना कारेगाव (ता.…

21 तास ago

चासकमान डाव्या कालव्यातुन ६०० क्युसेकचा विसर्ग; खाली पोहचते १८० क्युसेकने पाणी मग ४२० क्युसेक पाणी नक्की जाते कुठे…?

धरणापासून अस्तरीकरण करण्याऐवजी टेलकडून काम सुरु करण्याचा घाट; प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह...?…

23 तास ago