मुख्य बातम्या

शिरुरमध्ये आढळली पावाच्या लादीत घुशीची लेंडी ; नागरिकांमध्ये संतापाची लाट

अन्न प्रशासन विभाग दाखवा आणि बक्षीस मिळवा असे म्हणण्याची नागरिकांवर वेळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे):शिरूर शहरालगत रामलिंग रोडवर असणाऱ्या सिरवी बंधू मिठाईवाले या स्वीटहोम बेकरीतून विकत घेतलेल्या पावामध्ये चक्क घुशीची लेंडी आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २० जुलै रोजी सतीष तागड यांच्या बाबतीत घडली. त्यांनी दोन पावाच्या लाद्या विकत घेतल्या असता त्यामध्ये एका लादीत चक्क घुशीची घाणेरडी मोठी लेंडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर सतीष तागड यांनी सिरवी बंधू बेकरीत धाव घेत याबाबत इतर ग्राहकांसमोर हा प्रकार उघड केला. जर हा पाव कुण्या लहान मुलांनी किंवा आजारी व्यक्तींनी खाल्ला असता, तर त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला असता, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

या घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि ग्राहकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. अन्न सुरक्षा व औषध प्रशासन (FDA) विभागावर देखील प्रचंड टीका केली जात आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, “शिरूर शहर व तालुक्यातील बेकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असून, अन्न प्रशासन यंत्रणा केवळ फाईलांपुरती सक्रिय आहे.”

शिरूर आणि परिसरातील अनेक हॉटेल्समध्ये शिळे, खराब व बिनधास्त साठवलेले पदार्थ खुलेआम ग्राहकांना दिले जात आहेत. अन्न व सुरक्षा विभागाचे कोणतेही नियमित निरीक्षण नसल्याने असे प्रकार सर्रास घडतात. अन्न प्रशासन आधिकार “दाखवा आणि बक्षीस मिळवा” ही धोरणं उपहासात्मक ठरत असून, नागरिकांचा थेट जीव धोक्यात घालणाऱ्या व्यवसायांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे.

या गंभीर प्रकरणावरून संतप्त नागरिकांनी तातडीने संबंधित बेकरीवर कठोर कारवाई करावी, तसेच संपूर्ण शिरूर तालुक्यातील हॉटेल्स, बेकऱ्यांचे अन्न सुरक्षा तपासणी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

शहरात याप्रकारे मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या खाद्य व्यावसायिकांवर जर वेळेत व कठोर कारवाई झाली नाही, तर नागरिक आंदोलनाच्या तयारीत असल्याचेही संकेत मिळाले आहेत. प्रशासनाने तातडीने अन्न सुरक्षा यंत्रणा सक्रीय करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

ही घटना शिरूरसारख्या वाढत्या शहरात अन्न सुरक्षेचा ढासळलेला चेहरा दाखवते, आणि प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवते. आता तालुका प्रशासन आणि अन्न सुरक्षा विभाग यातून काय धडा घेते हे पाहणं महत्त्वाचे ठरेल. या बेकरी, हॉटेल्स बरोबर शिरूर तालुक्यात दुधाची भेसळ मोठ्या प्रमाणावर होत असून नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात असून यावर अंध प्रशासन विभागाने कठोर कारवाई करण्याची मागणी आता शिरूर तालुक्यातील जनतेकडून होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

12 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

21 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

21 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

22 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 दिवस ago