महाराष्ट्र

अजित पवारांचा मृत्यू हा अपघात नाही, तर षडयंत्रच! राखी सावंतचा खळबळजनक आरोप

बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामतीत लँडिंग करताना चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. या दुर्घटनेनंतर विमानाला भीषण आग लागली होती. या अपघातात अजित पवार यांच्यासह दोघे वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक, अंगरक्षक विदीप जाधव तसेच फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.

या दुर्घटनेनंतर अनेक राजकीय नेते, कलाकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून, अभिनेत्री राखी सावंत हिने याप्रकरणी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना राखी सावंतने या घटनेमागे राजकीय षडयंत्र असल्याची शंका व्यक्त केली.

राखी सावंत म्हणाली, “मी अजित दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले आहे. त्यांच्या जाण्याने मला खूप दुःख झाले आहे. कोणी काहीही म्हणो, पण मला वाटते की यामागे राजकारण आहे. हा अपघात नसून एक षडयंत्र आहे. ते आमचे आवडते नेते होते. हे षडयंत्र आहे, बरोबर ना?” असे वक्तव्य तिने माध्यमांशी बोलताना केले. तिच्या या विधानामुळे चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी संयम राखण्याचे आवाहन केले आहे. जामनेर येथे आयोजित श्रद्धांजली सभेत बोलताना ते म्हणाले की, “विमान दुर्घटनेची सखोल चौकशी निश्चितच केली जाईल, मात्र अशा दुर्दैवी प्रसंगी कोणत्याही प्रकारचे राजकारण होऊ नये. ही वेळ एका महान नेत्याला सन्मानाने निरोप देण्याची आणि त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्याची आहे.”

जामनेर येथील नगरपालिका चौकात झालेल्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत नागरिकांसह विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भावना अनावर झालेल्या महाजन यांनी, “अजितदादा केवळ ज्येष्ठ नेते नव्हते, तर ते एक दिलदार मित्र आणि दमदार नेता होते,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या अचानक जाण्याने समर्थकांमध्ये तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…

11 तास ago

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…

15 तास ago

गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय

छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…

15 तास ago

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…

15 तास ago

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…

15 तास ago

पुण्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटना; चिमुकलीचा मृत्यू, तर मद्यधुंद कारचालकाच्या अपघातात दोघांचा बळी

पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…

15 तास ago