महाराष्ट्र

अजित पवारांचा मृत्यू हा अपघात नाही, तर षडयंत्रच! राखी सावंतचा खळबळजनक आरोप

बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामतीत लँडिंग करताना चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. या दुर्घटनेनंतर विमानाला भीषण आग लागली होती. या अपघातात अजित पवार यांच्यासह दोघे वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक, अंगरक्षक विदीप जाधव तसेच फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.

या दुर्घटनेनंतर अनेक राजकीय नेते, कलाकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून, अभिनेत्री राखी सावंत हिने याप्रकरणी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना राखी सावंतने या घटनेमागे राजकीय षडयंत्र असल्याची शंका व्यक्त केली.

राखी सावंत म्हणाली, “मी अजित दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले आहे. त्यांच्या जाण्याने मला खूप दुःख झाले आहे. कोणी काहीही म्हणो, पण मला वाटते की यामागे राजकारण आहे. हा अपघात नसून एक षडयंत्र आहे. ते आमचे आवडते नेते होते. हे षडयंत्र आहे, बरोबर ना?” असे वक्तव्य तिने माध्यमांशी बोलताना केले. तिच्या या विधानामुळे चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी संयम राखण्याचे आवाहन केले आहे. जामनेर येथे आयोजित श्रद्धांजली सभेत बोलताना ते म्हणाले की, “विमान दुर्घटनेची सखोल चौकशी निश्चितच केली जाईल, मात्र अशा दुर्दैवी प्रसंगी कोणत्याही प्रकारचे राजकारण होऊ नये. ही वेळ एका महान नेत्याला सन्मानाने निरोप देण्याची आणि त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्याची आहे.”

जामनेर येथील नगरपालिका चौकात झालेल्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत नागरिकांसह विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भावना अनावर झालेल्या महाजन यांनी, “अजितदादा केवळ ज्येष्ठ नेते नव्हते, तर ते एक दिलदार मित्र आणि दमदार नेता होते,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या अचानक जाण्याने समर्थकांमध्ये तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मुंबई: आजचा दिवस अनेक राशींसाठी नवीन संधी, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे.…

2 तास ago

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

12 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

12 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

17 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

17 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

17 तास ago