महाराष्ट्र

अजित पवारांचा मृत्यू हा अपघात नाही, तर षडयंत्रच! राखी सावंतचा खळबळजनक आरोप

बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामतीत लँडिंग करताना चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. या दुर्घटनेनंतर विमानाला भीषण आग लागली होती. या अपघातात अजित पवार यांच्यासह दोघे वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक, अंगरक्षक विदीप जाधव तसेच फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.

या दुर्घटनेनंतर अनेक राजकीय नेते, कलाकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून, अभिनेत्री राखी सावंत हिने याप्रकरणी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना राखी सावंतने या घटनेमागे राजकीय षडयंत्र असल्याची शंका व्यक्त केली.

राखी सावंत म्हणाली, “मी अजित दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले आहे. त्यांच्या जाण्याने मला खूप दुःख झाले आहे. कोणी काहीही म्हणो, पण मला वाटते की यामागे राजकारण आहे. हा अपघात नसून एक षडयंत्र आहे. ते आमचे आवडते नेते होते. हे षडयंत्र आहे, बरोबर ना?” असे वक्तव्य तिने माध्यमांशी बोलताना केले. तिच्या या विधानामुळे चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी संयम राखण्याचे आवाहन केले आहे. जामनेर येथे आयोजित श्रद्धांजली सभेत बोलताना ते म्हणाले की, “विमान दुर्घटनेची सखोल चौकशी निश्चितच केली जाईल, मात्र अशा दुर्दैवी प्रसंगी कोणत्याही प्रकारचे राजकारण होऊ नये. ही वेळ एका महान नेत्याला सन्मानाने निरोप देण्याची आणि त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्याची आहे.”

जामनेर येथील नगरपालिका चौकात झालेल्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत नागरिकांसह विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भावना अनावर झालेल्या महाजन यांनी, “अजितदादा केवळ ज्येष्ठ नेते नव्हते, तर ते एक दिलदार मित्र आणि दमदार नेता होते,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या अचानक जाण्याने समर्थकांमध्ये तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २०५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शालोपयोगी साहित्याचे वाटप

मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक…

3 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांवर शिक्रापूर पोलिसांचा वचक; दोन महिला रंगेहात जेरबंद

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या…

3 तास ago

शिरूरमध्ये तरुणाला अडवून पाच जणांकडून बेदम मारहाण; कामावरून काढल्याच्या रागातून हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): "तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले," असा जाब विचारत एका…

4 तास ago

ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?

मुंबई: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी "ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?" या शीर्षकाची एक व्यंगात्मक…

7 तास ago

सहा खासदारांची बंडखोरी म्हणजे जनतेशी व महाविकास आघाडीशी विश्वासघात; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी केलेली बंडखोरी ही केवळ उद्धव ठाकरे…

7 तास ago

झोपण्यापूर्वी पाणी अवश्य प्यावे

अनेकदा डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यास पाण्यापासून मिळणारे फायदे…

7 तास ago