मुंबई: विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं, राज्यात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीचे 232 उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं, पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आल.
दरम्यान त्यानंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते हे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करताना दिसत आहेत.
दरम्यान राज्यात आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. प्रतिभा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती, अखेर त्यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. आज जळगावमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला, या मेळाव्यात त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला.
आम्ही सत्तेवर असलो तरच निर्णय घेऊ शकतो, आम्ही सत्तेत असलो तर धोरण ठरवू शकतो. प्रतिभा शिंदे ताई तुम्हाला राष्ट्रवादीत येण्याची चूक केली असं कधीही वाटणार नाही, आमचे सर्व सहकारी तुमच्यासोबत एकत्र काम करतील. गेल्या 35- 40 वर्षांत आम्ही अनेक चढउतार पाहिले, सत्ता असताना प्रश्न सुटतात, सत्ता नसताना काय अडचणी येतात हे अनुभवलं, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी हा पक्ष प्रवेश झाल्यामुळे जळगावमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद आता वाढणार आहे.
शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…
मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…
सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…
हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…
कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…
1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…