महाराष्ट्र

सकल मराठा घाटकोपर जनजागृती बाईक रॅली

मुंबई: मुंबई,घाटकोपर,आज रविवार (दि. २४) ऑगस्ट २०२५ रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने घाटकोपर विभागात भव्य जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली. ही रॅली भटवाडी सिद्धी गणेश मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक,अमृतनगर सर्कल येथे संपन्न झाली.

समाजातील हजारो बंधू-भगिनी व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाजाच्या ऐक्याचा आणि एकतेचा भक्कम संदेश दिला.या रॅलीचे आयोजन माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आझाद मैदान आंदोलनाच्या समर्थनार्थ करण्यात आले होते. मराठा समाजाच्या हक्काच्या लढ्यात घाटकोपर विभागातील सर्व समाजबांधव एकदिलाने सहभागी होणार असल्याचा निर्धार या रॅलीमधून व्यक्त झाला.

ही बाईक रॅली फक्त निदर्शनापुरती मर्यादित न राहता, समाजाच्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी व समाज जागृतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली. रॅली दरम्यान परिसरात “एक मराठा लाख मराठा”, “जय शिवराय – जय जिजाऊ” या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. भव्य बाईक रॅलीत समाजातील युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला घाटकोपर मराठा समाजाचा ठाम पाठिंबा.पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी व समाज एकतेसाठी हे आंदोलन महत्त्वाचे असल्याचा संदेश. घाटकोपर परिसरात समाजबांधवांनी दिला एकजुटीचा दणदणीत आवाज.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

17 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

18 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

18 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

18 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

19 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

19 तास ago