आरोग्य

भेंडीचे पाणी पिण्याचे फायदे

भेंडीचे पाणी आरोग्यासाठी गुणकारी आहे. यामध्ये खनिजे, जीवनसत्व मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे सकाळी उठल्या नंतर भेंडीचे पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करावी. भेंडीत असलेल्या गुणधर्मांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसेच यात जीवनसत्वे, खनिजे, पोषक घटक इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे सकाळी उठल्या नंतर भेंडीचे पाणी पिऊ शकता. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, तसेच यात असलेल्या अँटी-ऑक्सिडंटमुळे शरीर अनेक आजारा पासून दूर राहते.

भेंडीचे पाणी कसे बनवावे

सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याचे देठ काढून उभे चार तुकडे करा.

रात्री एक ग्लास पाण्यात हे भेंडीचे तुकडे भिजत घाला.

सकाळी उठल्या नंतर रिकाम्या पोटी हे पाणी प्या. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल.

आरोग्यदायी फायदे

भेंडीच्या पाण्यात अघुलनशील घटक असतात, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. हे पाणी प्यायल्या नंतर कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी होऊन आरोग्याला फायदे होतात.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी भेंडीचे पाणी फायदेशीर आहे. या पाण्यात कॅलरीज नसतात आणि शरीराला हायड्रेट राहून चयापचय वाढण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी भेंडीचे पाणी प्यायल्यास पोट काही वेळ भरलेले राहते, तसेच वजन कमी होण्यास मदत होते.

पचनक्रिया सुधारण्यासाठी भेंडीचे पाणी गुणकारी आहे. यामध्ये पाण्यात विरघळणारे फायबर असतात. जे बद्धकोष्ठतेपासून शरीराला आराम देतात. त्यामुळे सकाळी एक ग्लास भेंडीचे पाणी प्यावे.

कोलेस्ट्रॉल आणि एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी भेंडीचे पाणी प्यावे. तसेच भेंडीच्या भाजीचा आणि पाण्याचा आहारात समावेश करावा.

रोजच्या आहारात भेंडी पासून बनवलेले पदार्थ खावे. जेणेकरून आरोग्य सुधारण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

6 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

6 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

6 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

9 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

10 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

10 तास ago