नवी दिल्ली: Sunil Tatkare यांनी आज दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व समज-गैरसमज दूर झाल्याचा दावा करत, पक्षसंघटनेची मजबूत बांधणी आणि विस्तारासाठी लवकरच राज्यव्यापी दौरा करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसंदर्भात निवडणूक आयोगाला आवश्यक ते सुधारित पत्र येत्या काही दिवसांत सादर करण्यात येईल. यासाठी पक्षांतर्गत बैठकीत सर्व नेत्यांमध्ये सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
विलीनीकरणाच्या चर्चेबाबत बोलताना Sharad Pawar यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष Shashikant Shinde आणि Supriya Sule यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडल्याने त्या विषयात आता काहीही शिल्लक राहिलेले नसल्याचे तटकरे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस हा शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर तसेच Yashwantrao Chavan यांच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष असल्याचे सांगत, पक्षातील सर्व निर्णय एकमताने घेतले जातात आणि पक्षात लोकशाही पद्धतीने कामकाज चालते, अशी भूमिका त्यांनी मांडली.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस हा एनडीएमधील प्रमुख घटक पक्ष असून, Bharatiya Janata Party यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्यात काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विकासाभिमुख भूमिका कायम ठेवून पुढील काळात कामांना अधिक गती दिली जाईल, असेही तटकरे यांनी नमूद केले.
२५ मेपर्यंत कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा पुणे: सत्यजीत तांबे यांच्या पुढाकारातून पुणे येथे शिक्षण…
मुंबई: सातारा जिल्ह्यातील वाई नगरीला “दक्षिण काशी” म्हणून ओळखले जाते. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या या…
ठाणे: ठाण्यातील गावदेवी मार्केटला आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या अग्निशमन दलाच्या जवान आणि…
मुंबई: Indian National Congress पक्षाने राज्यभर सुरू असलेल्या “संघटन सृजन अभियान” अंतर्गत जिल्हाध्यक्ष नियुक्त्यांमध्ये व्यापक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या गेल्या १२ वर्षांच्या सत्ताकाळाच्या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि प्रदीप गुप्ता…
नवी दिल्ली : केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलिंडर अनुदानाच्या नियमांमध्ये मोठे बदल करत सबसिडी वितरण…