महाराष्ट्र

उबाठा गटात ‘संशय कल्लोळ’चा प्रयोग; खासदारांकडून रोज निष्ठेची परीक्षा; डॉ. ज्योती वाघमारे

मुंबई: शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर जोरदार टीका करत पक्षातील वातावरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खासदारांमधील असंतोष दडपण्यासाठी खोट्या बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

उबाठा गटात सध्या ‘संशय कल्लोळ’ नाटकाचा प्रयोग सुरू असल्यासारखी परिस्थिती असून, खासदारांना दररोज निष्ठा सिद्ध करण्यासाठी आणाभाका घ्याव्या लागत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. “खासदारांसाठी एक न्याय आणि युवराजांसाठी वेगळा का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

डॉ. वाघमारे म्हणाल्या की, उबाठा गट संशयाच्या गर्तेत अडकला आहे. खासदारांना निष्ठा सिद्ध करण्यासाठी आदेश दिले जात असताना आदित्य ठाकरे यांच्याबाबत मात्र मौन का पाळले जाते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट” असा दुहेरी न्याय पक्षात दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील नेतृत्वाची आठवण करून देत त्यांनी सांगितले की, बाळासाहेब सर्वांना समान वागणूक देत आणि शिवसैनिकांना संवगडी मानत. मात्र सध्याच्या नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांना घरगड्यांसारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

उबाठा गटातील खासदारांची अवस्था संशयी नवऱ्यासोबत नाईलाजाने राहणाऱ्या स्त्रीसारखी झाली असून त्यांना वारंवार निष्ठा सिद्ध करावी लागत असल्याची खरमरीत टीकाही त्यांनी यावेळी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २०५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शालोपयोगी साहित्याचे वाटप

मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक…

2 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांवर शिक्रापूर पोलिसांचा वचक; दोन महिला रंगेहात जेरबंद

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या…

2 तास ago

शिरूरमध्ये तरुणाला अडवून पाच जणांकडून बेदम मारहाण; कामावरून काढल्याच्या रागातून हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): "तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले," असा जाब विचारत एका…

2 तास ago

ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?

मुंबई: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी "ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?" या शीर्षकाची एक व्यंगात्मक…

5 तास ago

सहा खासदारांची बंडखोरी म्हणजे जनतेशी व महाविकास आघाडीशी विश्वासघात; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी केलेली बंडखोरी ही केवळ उद्धव ठाकरे…

5 तास ago

झोपण्यापूर्वी पाणी अवश्य प्यावे

अनेकदा डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यास पाण्यापासून मिळणारे फायदे…

6 तास ago