मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी ते मुंबईहून बारामतीकडे निघाले असताना सकाळी ८.४५ वाजता बारामती विमानतळाजवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली.
अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासांतच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पक्षाची धुरा हाती घेत त्यांनी वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकाही घेतल्या. मात्र, शरद पवार यांनी या शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे सांगितल्याने पवार कुटुंबातील मतभेद चर्चेत आले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विविध दौऱ्यांमुळे सक्रिय झाल्या असतानाच आणखी एक वाद समोर आला आहे. सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या गाडीचे स्टेअरिंग हाती घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सुनेत्रा पवार बाजूच्या सीटवर बसलेल्या असताना अनिकेत तटकरे गाडी चालवत असल्याचे दिसत आहे.
या घटनेवरून विरोधकांकडून तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रोटोकॉल भंग झाल्याचा आरोप केला जात आहे. उपमुख्यमंत्र्यांना झेड श्रेणीची सुरक्षा असताना अधिकृत वाहन केवळ अधिकृत चालकानेच चालवणे अपेक्षित असते. अशा परिस्थितीत अनधिकृत व्यक्तीने वाहन चालवणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते संदीप उदमले यांनीही या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “दादांच्या निधनावर शंका उपस्थित होत असताना सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष का करण्यात आले? काही अनुचित घटना घडली असती तर जबाबदार कोण?” असा सवाल त्यांनी केला आहे.दरम्यान, या प्रकरणावर अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेले नसून, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…
अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…