मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने दणदणीत विजय मिळवत महामंडळावरील आपले वर्चस्व कायम राखले आहे. थेट निवडणुकीसाठी झालेल्या १४ जागांपैकी सर्व १४ जागांवर समर्थ पॅनेलचे उमेदवार विजयी झाले, तर विरोधी चित्रकर्मी पॅनेलला एकही जागा मिळवता आली नाही.
महामंडळाच्या एकूण १७ जागांपैकी तीन जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित १४ जागांसाठी झालेल्या मतदानात सभासदांनी समर्थ पॅनेलच्या बाजूने स्पष्ट कौल दिला.निर्माता विभागातून मेघराज राजेभोसले आणि सुनील महाजन, दिग्दर्शक विभागातून दीपक कदम आणि अजित शिरोळे, लेखक विभागातून राज काजी, अभिनेता विभागातून सुशांत शेलार यांच्यासह विविध विभागांतील उमेदवारांनी विजय मिळवला.
दरम्यान, अभिनेत्री विभागातून वर्षा उसगावकर यांची बिनविरोध निवड झाली. तसेच संकलक विभागातून विजय खोचीकर आणि संगीत विभागातून आनंद शिंदे हेही बिनविरोध निवडून आले.या निकालामुळे मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वावर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले असून पुढील पाच वर्षांसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची धुरा समर्थ पॅनेलकडेच राहणार आहे.
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…
षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…
मुंबई: विक्रोळीतील टागोर नगर परिसरातील तक्षशील बुद्ध विहार येथे 49, स्वस्तिक एमराल्ड जयंतीउत्सव समिती, भारतीय…