महाराष्ट्र

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक तरतूद या निर्णयांना काँग्रेसचा विरोध नसला, तरी हे निर्णय विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात जाहीर करण्यात आल्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी म्हटले आहे.

गाडगीळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विचारले की, राज्यात आचारसंहिता लागू असताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती नेमक्या निवडणुकीच्या काळातच का जाहीर करण्यात आल्या?तसेच, नाशिकमधील निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठी अडचणीची ठरत असल्याचे दिसताच तपोवन विकासासाठी दोन हजार कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी ३६ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

यातील धक्कादायक बाब म्हणजे आचारसंहितेमुळे हे निर्णय अधिकृतपणे जाहीर केले जाणार नसल्याचे बैठकीत सांगितले गेले होते. असे असताना या निर्णयांची सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत कोणी आणि कशी पोहोचवली, याची चौकशी निवडणूक आयोगाने करावी, अशी मागणीही गाडगीळ यांनी केली.निवडणूक नियमांचे उघड उल्लंघन होत असल्याचा आरोप करत, राज्य निवडणूक आयोग याकडे दुर्लक्ष करणार की संबंधितांवर कारवाई करणार, असा परखड सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

1 तास ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

1 तास ago

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…

1 तास ago

एनडीए बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन ११ जूनला

षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…

1 तास ago

भारतातील आर्थिक-राजकीय संकटे! वास्तव आणि परिणाम विषयावर काँग्रेसचे चर्चासत्र १३ जूनला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…

1 तास ago

विक्रोळीत अवयवदान जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तिघांनी भरले अवयवदान संकल्पपत्र

मुंबई: विक्रोळीतील टागोर नगर परिसरातील तक्षशील बुद्ध विहार येथे 49, स्वस्तिक एमराल्ड जयंतीउत्सव समिती, भारतीय…

2 तास ago