पुणे: विधानसभेच्या २०२४ निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षाला एकामागून एक धक्के बसत आहेत. पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनीही अखेर पक्षाचा हात सोडला असून १६ जुलै रोजी ते भाजपात प्रवेश करणार आहेत.हा पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडणार असून सासवडमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात येण्याची शक्यता आहे.
संजय जगताप यांनी २०१९ ते २०२४ या कालावधीत पुरंदर मतदारसंघाचे आमदार म्हणून काम पाहिले. मात्र २०२४ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी त्यांचा पराभव केला. विशेष म्हणजे, २०१९ मध्ये याच विजय शिवतारेंना संजय जगताप यांनी हरवलं होतं.
जगताप यांच्याआधी संग्राम थोपटे आणि रविंद्र धंगेकर या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे पुण्यात काँग्रेसची गळती अधिकच गंभीर होत चालली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, काँग्रेसची कोरडी होत चाललेली संघटनात्मक ताकद आणि नेतृत्वातील अनिश्चितता यामुळे पक्षातील अनेक नेते भविष्याचा विचार करून भाजपकडे वळत आहेत.
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…