महाराष्ट्र

पॉलीटेक्निक प्रवेशासाठी अर्जाची मुदत ६ जुलैपर्यंत वाढली.

मुंबई: राज्यातील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ६ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम मुदत २ जुलै होती. मात्र विद्यार्थ्यांकडून मुदतवाढीची सातत्याने होत असलेली मागणी आणि प्रवेश प्रक्रियेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन ही मुदत वाढविण्यात आली आहे.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, अंतिम मुदतीपर्यंत राज्यभरातून १ लाख ६१ हजार ७८६ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, त्यापैकी १ लाख ३२ हजार ९९६ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत.

ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता, ऑनलाइन अर्ज, शुल्क भरणे तसेच तांत्रिक अडचणींमुळे वेळेत अर्ज पूर्ण करता आला नव्हता. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही अखेरची संधी देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन उच्च व तंत्र शिक्षण अधिक विद्यार्थी-केंद्रित, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी प्रयत्नशील असून, कोणताही पात्र विद्यार्थी केवळ मुदतीअभावी प्रवेशापासून वंचित राहू नये, हा शासनाचा उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.

इच्छुक विद्यार्थ्यांनी ६ जुलैपूर्वी अर्ज निश्चित करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक, नियमावली, आवश्यक कागदपत्रांची माहिती आणि ऑनलाइन अर्जाची सुविधा dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास ६ महिन्यांची मुदत

मुंबई: राज्यातील अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत राज्य…

2 तास ago

महापुरुषांच्या साहित्याच्या पुनर्मुद्रणाला गती; संशोधनाधिष्ठित साहित्यनिर्मितीवर भर; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: समाज परिवर्तनासाठी थोर महापुरुषांच्या जीवनकार्याचे सखोल संशोधन होणे गरजेचे असून, चरित्र-साधने प्रकाशन समित्यांनी समाजोपयोगी…

5 तास ago

हरित इंधन की महागडा प्रयोग? नागरिकांच्या खिशाची जबाबदारी कोणाची?

मुंबई: देशाला हरित ऊर्जा हवी, पर्यावरणाचे संरक्षण झाले पाहिजे आणि परदेशी तेलावरील अवलंबित्व कमी झाले…

5 तास ago

शिरुर; ‘हेड टू टेल’ आणि ‘टेल टू हेड’ समजायला विद्यमान आमदारांना अजुन काही दिवस लागतील”; अशोक पवार

शिरुर (तेजस फडके) सध्या शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विद्यमान आमदार माऊली कटके…

6 तास ago

आमदाबाद येथील नितीन थोरात यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान!

शिरूर : शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावचे सुपुत्र आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी…

7 तास ago

डॉ. श्रीकांत शिंदे! विकासाभिमुख नेतृत्वाची ओळख अधिक दृढ

मुंबई: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी पायाभूत सुविधा, आरोग्य, वाहतूक आणि…

10 तास ago