महाराष्ट्र

महापुरुषांच्या साहित्याच्या पुनर्मुद्रणाला गती; संशोधनाधिष्ठित साहित्यनिर्मितीवर भर; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: समाज परिवर्तनासाठी थोर महापुरुषांच्या जीवनकार्याचे सखोल संशोधन होणे गरजेचे असून, चरित्र-साधने प्रकाशन समित्यांनी समाजोपयोगी व संशोधनाधिष्ठित साहित्यनिर्मितीला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महात्मा जोतिराव फुले चरित्र-साधने प्रकाशन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक अर्चना बोऱ्हाडे तसेच दोन्ही समित्यांचे सदस्य उपस्थित होते.

बैठकीत अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची महाराष्ट्रासह देशभरात मोठी मागणी असून उपलब्ध खंड संपल्यामुळे पुनर्मुद्रणाची गरज अधोरेखित करण्यात आली. यानुसार यापूर्वी प्रकाशित सातही खंडांचे पुनर्मुद्रण करून नव्याने प्रकाशन करण्यास मान्यता देण्यात आली.

तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या कथा, कादंबऱ्या आणि इतर साहित्यावर आधारित स्वतंत्र स्वरूपातील दहा ग्रंथांचे प्रकाशन त्यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट २०२६ रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राने गेल्या पाच वर्षांत अण्णाभाऊ साठे यांच्या संपूर्ण साहित्याचे ६५ ग्रंथ विविध भाषांमध्ये भाषांतरित केले आहेत. यामध्ये गुजरातीतील १५, हिंदीतील १५, इंग्रजीतील ३१, इंग्रजीतून रशियनमधील ३ आणि तमिळमधील २ ग्रंथांचा समावेश आहे. हे भाषांतरित साहित्य देश-विदेशातील वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावे यासाठी संबंधित भाषांतील नामांकित प्रकाशकांमार्फत उच्च दर्जाच्या छपाईसह प्रकाशन करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.

महात्मा जोतिराव फुले आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वैचारिक साहित्याचा व्यापक प्रसार करून नव्या पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहोचविण्यासाठी पुनर्मुद्रण, नवीन साहित्यनिर्मिती, भाषांतरे आणि प्रकाशन या उपक्रमांना अधिक गती दिली जाणार असल्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

हरित इंधन की महागडा प्रयोग? नागरिकांच्या खिशाची जबाबदारी कोणाची?

मुंबई: देशाला हरित ऊर्जा हवी, पर्यावरणाचे संरक्षण झाले पाहिजे आणि परदेशी तेलावरील अवलंबित्व कमी झाले…

2 तास ago

शिरुर; ‘हेड टू टेल’ आणि ‘टेल टू हेड’ समजायला विद्यमान आमदारांना अजुन काही दिवस लागतील”; अशोक पवार

शिरुर (तेजस फडके) सध्या शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विद्यमान आमदार माऊली कटके…

3 तास ago

आमदाबाद येथील नितीन थोरात यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान!

शिरूर : शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावचे सुपुत्र आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी…

4 तास ago

डॉ. श्रीकांत शिंदे! विकासाभिमुख नेतृत्वाची ओळख अधिक दृढ

मुंबई: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी पायाभूत सुविधा, आरोग्य, वाहतूक आणि…

7 तास ago

परिणय फुके यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार प्रतिउत्तर

मुंबई: भाजपचे आमदार परिणय फुके यांनी राज ठाकरे यांच्याबाबत केलेले वक्तव्य म्हणजे "चोराच्या उलट्या बोंबा"…

7 तास ago

राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करा; आयुष्मान योजनेचा विस्तार करा; सत्यजीत तांबे

मुंबई: राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासकीय आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम…

7 तास ago