महाराष्ट्र

कायदा सुव्यस्थेची लक्तरे वेशीवर, कायद्याचा गुन्हेगारांना धाक नाही: अंबादास दानवे

मुंबई: राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढारलेल्या महाराष्ट्रात कायद्याचा धाक राहिला नाही. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आणि गृहमंत्र्यांच्या नागपुरात महिला आणि सामान्य नागरिकच सुरक्षित नाहीत तर राज्यातील जनतेची काय स्थिती असेल असा रोखठोक प्रश्न करीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्ला चढविला. “महाराष्ट्रात दिवसाढवळ्या अपहरण, बलात्कार, लूटमार, फसवणुकीसारख्या घटना घडत आहेत. शिंदे सरकारच्या कार्यकाळात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, अशी दानवे यांनी आज अंतिम आठवड्याच्या प्रस्तावातील कायदा सुव्यवस्था या विषयावरील भाषणात बोलताना केली.

“एकीकडे गृहमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या नागपूर मध्ये पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ठाणे जिल्ह्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात महिला कर्मचाऱ्याने आत्महत्या का केली ? त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का? पोलीस ठाण्यात अशी घटना होणे ही राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. ठाणे जिल्ह्यातच डान्सबार सुरू असल्याचे माध्यमांनी स्टिंग ऑपरेशन करून समोर आणले. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या जिल्ह्यातच मुली व महिला सुरक्षित नाही ही राज्यासाठी लाजिरवाणीबाब आहे,” अश्या शब्दात त्यांनी सरकारच्या अपयशाची लक्तरे वेशीवर टांगली.

अल्पवयीन मुली, महिला यांच्यावरील अत्याचाराच्या घटनेत गेल्या 2 महिन्यात वाढ झाली. तर भंडाऱ्याच्या घटनेने महाराष्ट्र ढवळून निघाला, त्यातील आरोपींना कठोर कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी केले. राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यस्था पाहता मोठया संख्येने पोलीस भरती तातडीने करावी तसेच कार्यरत पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्यावर समुपदेशन करणे गरजेचे आहे. यासाठी सरकार पावले उचलणार का असा सवाल विरोधी पक्षनेते यांनी सरकारला विचारला.

“कात्रज येथे एका मंत्र्याच्या गाडीवर दगडफेक झाली तेव्हा ते प्रकरण न्यायालयात गेले असता पुरावे नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते. तरी शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले. याउलट दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे आमदार दिवसाढवळ्या सरकारी अधिकारी,पुरवठादार कंत्राटदार यांना धमकावत आहे. तसे पुरावे माध्यमांकडे व व्हिडीओ स्वरूपात आहे. मात्र सरकार त्यावर तपासून बघू असे म्हणत आमदारांना सुरक्षा कवचाचे आंदण देत आहेत,”अश्या शब्दात त्यांनी सरकारच्या दुटप्पीपणाचे पितळ उघडे पाडले.

पूर्वी राज्यात कायदा सुव्यवस्थेचा धाक होता, मात्र आता अपहरण, अत्याचाराच्या घटना व सत्ताधारी लोकप्रतिनिधीकडून धमकी देण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे न्याय नेमका कोणाकडे मागायचा? सरकार यावर काय भूमिका घेणार असा सवाल करत त्यांनी सरकारला धारेवर धरले. लोकप्रतिनिधींकडून राज्यात दादागिरीचा प्रकार होत आहे. त्या संबंधित चार आमदारांवर कडक कारवाईची मागणी दानवे यांनी केली आहे. दिवसेगणिक सायबर गुन्हे वाढत आहेत. त्यामुळे सरकारने त्यावर बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसेच टेक्नॉलॉजीचा वाढत असलेला वापर पाहता भविष्यात सायबर गुन्हे वाढण्याची शक्यता आहे. मात्र ते प्रतिबंध करण्यासाठीची शासकीय यंत्रणा कमकुवत असल्यावर दानवे यांनी बोट ठेवले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शब्दवीर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा टोकदार वार

मुंबई: “मुंबई महाराष्ट्राची कधीच होणार नाही!” ही घोषणा त्या काळातील केवळ राजकीय भूमिका नव्हती, तर…

56 मिनिटे ago

ठाण्यात पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस सुरू; प्रवास होणार अधिक सुखकर

ठाणे: ठाणे महानगरातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ…

1 तास ago

सातारा जिल्ह्याला राज्यात अव्वल करण्यासाठी कटिबद्ध; पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा: महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया घालणारे यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत…

1 तास ago

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…

1 दिवस ago

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…

1 दिवस ago

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

1 दिवस ago