पैठण: पैठण येथे सुरू असलेल्या संत एकनाथ महाराज षष्ठी महोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच आज सकाळी गोदावरी नदीपात्रात दुर्दैवी घटना घडली. सिल्लोड तालुक्यातील एका ६० वर्षीय वारकऱ्याचा पवित्र स्नानासाठी नदीत उतरले असताना बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे वारकरी संप्रदायात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील श्री क्षेत्र मुक्ताई संस्थान (हाळदा) येथील दिंडी पैठण येथे दाखल झाली होती. या दिंडीतील वारकरी बाबुराव रुद्राजी बगळे (वय ६०) हे आज (१० मार्च) सकाळी सुमारे आठ वाजता गोदावरी नदीत स्नानासाठी उतरले. मात्र नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते अचानक खोल पाण्यात ओढले गेले. सोबत असलेल्या वारकऱ्यांनी आरडाओरडा करत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु पाण्याचा प्रवाह आणि खोलीमुळे ते क्षणार्धात दिसेनासे झाले.
घटनेची माहिती मिळताच पैठण येथील बंदोबस्तावर तैनात असलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने धाव घेतली. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्र अधिकारी विजय राठोड, जवान मच्छिंद्र जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बगळे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.नाथषष्ठी महोत्सवानिमित्त पैठणमध्ये लाखो भाविकांची गर्दी होत असल्याने प्रशासनाने गोदावरी नदीपात्रात स्नान करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…
अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…