महाराष्ट्र

कट मारल्याच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; महिलेसह दोन अल्पवयीनांवर गुन्हा

पुणे: शहरातील कोंढवा परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. दुचाकी चालवताना ‘कट’ मारल्याच्या वादातून ही मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे.या प्रकरणी एका महिलेसह दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहेत. या घटनेमुळे भाग्योदयनगर परिसरात काही काळ खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (६ मार्च) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराचा पुतण्या कोंढवा खुर्द येथील मक्का ओम सोसायटी परिसरातून दुचाकीवरून जात होता. यावेळी रस्त्यावरून जाताना त्याचा काही जणांशी वाद झाला. “कट का मारला?” या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला आणि काही क्षणांतच तो वाढत गेला.

यानंतर एका महिलेसह दोन अल्पवयीन मुलांनी त्या तरुणाला थांबवून त्याच्यावर हल्ला केला. तिघांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली. मारहाण करताना तरुणाच्या डोक्यावर वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पुणे शहर पोलीस अंतर्गत येणाऱ्या कोंढवा पोलीस स्टेशन च्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणी महिलेसह दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी घटना घडल्यानंतर फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक खोपडे करत आहेत. किरकोळ वादातून थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत प्रकरण गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

4 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

5 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

5 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

5 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

5 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

5 तास ago