महाराष्ट्र

बदलापूर हादरला! शालेय मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांची कडक नियमावली जाहीर

बदलापूर: बदलापूर येथे शालेय मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. शहरातील शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि पालकांसाठी नवीन सुरक्षा नियमावली जाहीर करण्यात आली असून, नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या दोन वर्षांत अल्पवयीन मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. नुकत्याच एका १२ वर्षीय शालेय मुलीचा स्कूल बस चालकाकडून विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यापूर्वीही २०२४ मध्ये नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना देशभर गाजली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी १२० शाळांच्या प्रतिनिधींची बैठक घेत स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या.

काय आहेत नवे सुरक्षा नियम?

विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या प्रत्येक वाहनात जीपीएस आणि सीसीटीव्ही अनिवार्य

शालेय वाहनात पुरुष चालकासोबत महिला मदतनीस असणे बंधनकारक

चालक आणि वाहनमालकाचे चारित्र्य प्रमाणपत्र तपासणे आवश्यक

सर्व वाहनांची माहिती आरटीओमध्ये नोंदणीकृत असावी

क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आढळल्यास कठोर कारवाई

दरमहा पालक समिती बैठक घेणे अनिवार्य

पालकांचीही जबाबदारी वाढली

पोलिसांनी पालकांना मुलांच्या प्रवासावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. जीपीएस प्रणालीचा वापर करून मुलांच्या लोकेशनची माहिती ठेवावी, बस स्टॉप परिसरात सीसीटीव्ही असल्याची खातरजमा करावी आणि चालक-मदतनीसांची पार्श्वभूमी तपासावी, असे सांगण्यात आले आहे.

शाळांसाठी स्पष्ट इशारा

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. शाळांनी केवळ नियम कागदावर न ठेवता त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मुलांचे बालपण सुरक्षित आणि आनंददायी राहावे यासाठी प्रशासन, शाळा आणि पालक यांच्यात समन्वय असणे अत्यावश्यक असल्याचेही बैठकीत अधोरेखित करण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

फडणवीसांइतकेच विलासराव देशमुखही माझे आवडते मुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य

पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…

2 तास ago

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…

4 तास ago

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

6 तास ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

18 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

19 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

19 तास ago