महाराष्ट्र

बदलापूर हादरला! शालेय मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांची कडक नियमावली जाहीर

बदलापूर: बदलापूर येथे शालेय मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. शहरातील शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि पालकांसाठी नवीन सुरक्षा नियमावली जाहीर करण्यात आली असून, नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या दोन वर्षांत अल्पवयीन मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. नुकत्याच एका १२ वर्षीय शालेय मुलीचा स्कूल बस चालकाकडून विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यापूर्वीही २०२४ मध्ये नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना देशभर गाजली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी १२० शाळांच्या प्रतिनिधींची बैठक घेत स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या.

काय आहेत नवे सुरक्षा नियम?

विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या प्रत्येक वाहनात जीपीएस आणि सीसीटीव्ही अनिवार्य

शालेय वाहनात पुरुष चालकासोबत महिला मदतनीस असणे बंधनकारक

चालक आणि वाहनमालकाचे चारित्र्य प्रमाणपत्र तपासणे आवश्यक

सर्व वाहनांची माहिती आरटीओमध्ये नोंदणीकृत असावी

क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आढळल्यास कठोर कारवाई

दरमहा पालक समिती बैठक घेणे अनिवार्य

पालकांचीही जबाबदारी वाढली

पोलिसांनी पालकांना मुलांच्या प्रवासावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. जीपीएस प्रणालीचा वापर करून मुलांच्या लोकेशनची माहिती ठेवावी, बस स्टॉप परिसरात सीसीटीव्ही असल्याची खातरजमा करावी आणि चालक-मदतनीसांची पार्श्वभूमी तपासावी, असे सांगण्यात आले आहे.

शाळांसाठी स्पष्ट इशारा

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. शाळांनी केवळ नियम कागदावर न ठेवता त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मुलांचे बालपण सुरक्षित आणि आनंददायी राहावे यासाठी प्रशासन, शाळा आणि पालक यांच्यात समन्वय असणे अत्यावश्यक असल्याचेही बैठकीत अधोरेखित करण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

1 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

1 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

2 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

2 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

2 तास ago

मोदींकडून बारामतीच्या नव्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण; पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मिळाली नवी गती

बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…

2 तास ago