आरोग्य

बाळाचे कान टोचताना टाळा ६ चुका, नाहीतर लहान बाळाला होते मोठे इन्फेक्शन-वाढते दुखण…

लहान मुलांचे कान टोचणे हा आपल्याकडे पारंपरिक आणि संस्कृतीचा भाग असला तरी, यात बाळाची काळजी घेणे आवश्यक असते. लहान बाळाचे कान टोचताना जरा चुकीची पद्धत किंवा दुर्लक्ष झाल्यास बाळाला संसर्ग, वेदना किंवा इतर गंभीर समस्या होऊ शकतात. यासाठीच, बाळाचे कान टोचण्यापूर्वी डॉक्टर सांगतात त्या महत्वाच्या ६ गोष्टी कोणत्या ते पाहूयात.

थोडासा निष्काळजीपणा झाला तर ही प्रक्रिया मुलांसाठी वेदनादायक ठरू नये साठी काय करावे 

१) 6 महिन्यांनंतर बाळाची प्रतिकारकशक्ती वाढलेली असते आणि कानाची पाळी देखील थोडी मोठी व मजबूत झालेली असते. त्यामुळे हा काळ बाळाचे कान टोचण्यासाठी सर्वात योग्य मानला जातो.

२. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर आपल्याला ६ महिन्यांपूर्वीच बाळाचे कान टोचायचे असतील तर किमान बाळाचे १४ आठवडे म्हणजेच साडेतीन महिन्यांपर्यंतचे लसीकरण पूर्ण झालेलं असावं, तेव्हाच कान टोचावे.

३. कान टोचण्यापूर्वी पालकांनी विशेष काळजी घ्यावी की, जेव्हा बाळाचे कान टोचणार असाल तेव्हा बाळ पूर्णपणे निरोगी असावं. बाळाला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन नसावं.

४. तुम्ही जर सोनाराकडून कान टोचण्याचा विचार करत असाल, तर त्यांनी या कामात प्रशिक्षण घेतलं आहे का आणि प्रक्रिया पूर्णपणे स्वच्छ व सुरक्षित पद्धतीनं होते का, हे नक्की तपासा.

५) कान टोचण्यापूर्वी सुमारे अर्धा तास आधी बाळाच्या कानावर नबिंग क्रीम किंवा आइस पॅक लावा, ज्यामुळे वेदना कमी होतील आणि बाळाला आरामदायक वाटेल.

६) बाळाचे कान टोचल्यानंतर, कानांत घालण्यासाठी फक्त सर्जिकल स्टील किंवा सोन्याचेच कानातलेच वापरावेत. या धातूंमुळे अ‍ॅलर्जी किंवा त्वचेवर कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होण्याचा धोका कमी असतो, त्यामुळे हे दोन्ही धातू बाळाच्या नाजूक त्वचेसाठी सुरक्षित मानले जातात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

13 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

13 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

13 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

13 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

13 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

13 तास ago