महाराष्ट्र

बांगलादेशी शोध मोहीम की भाजप कार्यकर्त्यांसाठी नवा रोजगार; ॲड. अमोल मातेले यांचा सवाल

मुंबई: मुंबई उपनगरात कथित बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय समित्या स्थापन करण्याची घोषणा सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. मात्र ही मोहीम खरोखरच बेकायदेशीर नागरिकांविरोधात आहे की भाजप कार्यकर्त्यांना नवे ‘रोजगार’ उपलब्ध करून देण्याचा मार्ग आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे.

मुंबईमध्ये हातगाड्या, फेरीवाले, बांधकाम मजूर आणि इतर कामांमध्ये बाहेरील नागरिक मोठ्या प्रमाणावर काम करताना दिसतात. हे वास्तव अनेक वर्षांपासून सर्वांना माहिती आहे. मग भाजप सत्तेत असताना आजवर या प्रश्नावर ठोस कारवाई का झाली नाही? आणि आता अचानक समित्या स्थापन करण्याची गरज का भासली, असा सवालही मातेले यांनी उपस्थित केला.

या समित्यांमध्ये भाजपचे कार्यकर्ते असणार असल्याची चर्चा सुरू आहे. जर तसे असेल, तर उद्या हेच कार्यकर्ते हातगाड्या लावण्याचे, फेरीवाल्यांकडून हप्ते वसूल करण्याचे आणि त्यांना संरक्षण देण्याचे काम करतील, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी बनावट जन्म प्रमाणपत्रे, आधारकार्ड किंवा इतर कागदपत्रे मिळवून देण्याच्या रॅकेटमध्येही राजकीय संरक्षण असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.

जर सरकार खरोखरच बेकायदेशीर नागरिकांविरोधात कारवाई करण्यास गंभीर असेल, तर सर्वप्रथम बनावट कागदपत्रांचे जाळे उध्वस्त केले पाहिजे. मात्र त्याऐवजी समित्या स्थापन करून राजकीय कार्यकर्त्यांना अधिकार देण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र दिसत आहे.

सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या समित्यांची रचना, अधिकार आणि कामकाज याबाबत संपूर्ण माहिती जनतेसमोर मांडावी. या समित्यांमध्ये प्रशासनातील अधिकारी असतील की फक्त पक्षाचे कार्यकर्ते असतील, हे स्पष्ट झाले पाहिजे. अन्यथा ही मोहीम कायद्याची अंमलबजावणी नसून राजकीय दिखावा आहे, अशी जनतेची भावना अधिक बळावेल.

मुंबईसारख्या महानगरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यासाठी राजकीय समित्यांचा आधार घेणे म्हणजे प्रशासनाच्या यंत्रणांवर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ पारदर्शक भूमिका जाहीर करावी, अशी मागणी ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे.

.ॲड. अमोल मातेले

प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार

अध्यक्ष, युवक मुंबई

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता

नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा रंगली…

11 तास ago

शिवसेना जनतेच्या दारी’ अभियानाचा राज्यभर विस्तार; शिंदेंकडून विकास, जनसेवा आणि युवा सक्षमीकरणाचा मंत्र

नेस्कोतील कार्यक्रमात २० हजार नागरिकांना शासकीय लाभांचे वितरण; दापोलीतील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटींची घोषणा…

11 तास ago

भांबर्डेतील मंदिर परिसर आणि जुना दहिवडी रस्ता चिखलमय; तातडीने मुरुम टाकण्याची ग्रामस्थांची मागणी

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): भांबर्डे (ता. शिरुर) गावातील मंदिर परिसरातील तळ्याच्या भरावावर तसेच जुन्या दहिवडी…

14 तास ago

‘कमळी’ मालिकेत आषाढी विशेष भाग; महाजन कुटुंबातील मोठं सत्य उघड होणार?

मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय 'कमळी' मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून,…

17 तास ago

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक फायदे शरीरास होतात.…

17 तास ago

वाल्मीक कराड तुरुंगात; परळीच्या राखेतून महाजनकोला वर्षभरात ₹35 कोटींचे उत्पन्न

निविदा प्रक्रियेमुळे अवैध राख माफियांना लगाम; तीन वर्षांतील सर्वाधिक महसूल महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या तिजोरीत…

17 तास ago