महाराष्ट्र

बांगलादेशी शोध मोहीम की भाजप कार्यकर्त्यांसाठी नवा रोजगार; ॲड. अमोल मातेले यांचा सवाल

मुंबई: मुंबई उपनगरात कथित बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय समित्या स्थापन करण्याची घोषणा सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. मात्र ही मोहीम खरोखरच बेकायदेशीर नागरिकांविरोधात आहे की भाजप कार्यकर्त्यांना नवे ‘रोजगार’ उपलब्ध करून देण्याचा मार्ग आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे.

मुंबईमध्ये हातगाड्या, फेरीवाले, बांधकाम मजूर आणि इतर कामांमध्ये बाहेरील नागरिक मोठ्या प्रमाणावर काम करताना दिसतात. हे वास्तव अनेक वर्षांपासून सर्वांना माहिती आहे. मग भाजप सत्तेत असताना आजवर या प्रश्नावर ठोस कारवाई का झाली नाही? आणि आता अचानक समित्या स्थापन करण्याची गरज का भासली, असा सवालही मातेले यांनी उपस्थित केला.

या समित्यांमध्ये भाजपचे कार्यकर्ते असणार असल्याची चर्चा सुरू आहे. जर तसे असेल, तर उद्या हेच कार्यकर्ते हातगाड्या लावण्याचे, फेरीवाल्यांकडून हप्ते वसूल करण्याचे आणि त्यांना संरक्षण देण्याचे काम करतील, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी बनावट जन्म प्रमाणपत्रे, आधारकार्ड किंवा इतर कागदपत्रे मिळवून देण्याच्या रॅकेटमध्येही राजकीय संरक्षण असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.

जर सरकार खरोखरच बेकायदेशीर नागरिकांविरोधात कारवाई करण्यास गंभीर असेल, तर सर्वप्रथम बनावट कागदपत्रांचे जाळे उध्वस्त केले पाहिजे. मात्र त्याऐवजी समित्या स्थापन करून राजकीय कार्यकर्त्यांना अधिकार देण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र दिसत आहे.

सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या समित्यांची रचना, अधिकार आणि कामकाज याबाबत संपूर्ण माहिती जनतेसमोर मांडावी. या समित्यांमध्ये प्रशासनातील अधिकारी असतील की फक्त पक्षाचे कार्यकर्ते असतील, हे स्पष्ट झाले पाहिजे. अन्यथा ही मोहीम कायद्याची अंमलबजावणी नसून राजकीय दिखावा आहे, अशी जनतेची भावना अधिक बळावेल.

मुंबईसारख्या महानगरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यासाठी राजकीय समित्यांचा आधार घेणे म्हणजे प्रशासनाच्या यंत्रणांवर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ पारदर्शक भूमिका जाहीर करावी, अशी मागणी ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे.

.ॲड. अमोल मातेले

प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार

अध्यक्ष, युवक मुंबई

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

7 तास ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

9 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

14 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

14 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

14 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

14 तास ago