महाराष्ट्र

महाशिवरात्रीला भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांसाठी बंद; जिल्हा प्रशासनाचा निर्णय

भीमाशंकर: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले प्रसिद्ध भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, सध्या मंदिर परिसरात डागडुजी व दुरुस्तीचे काम सुरू असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.

दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने भीमाशंकर येथे राज्यासह देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र, यावर्षी सुरू असलेल्या दुरुस्ती कामांमुळे तसेच भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करता, महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्यक्ष दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी भीमाशंकर येथे येणे टाळावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रशासनाने भाविकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली असून, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर नियमित दर्शन पुन्हा सुरू केले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे अनेक भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत असली तरी, मंदिराच्या दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्याचा बेस्ट घरगुती उपाय

आजकालच्या लाइफ स्टाईलमध्ये शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊन नसा ब्लॉक होणं एक सामान्य समस्या बनली आहे.…

59 मिनिटे ago

लसणाचे औषधी गुणधर्म

लसणाच्या पाकळ्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म…

1 तास ago

‘आपले राष्ट्र, आपला स्वाभिमान’; शक्तिशाली भारतासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन

एकता, कर्तव्य, युवाशक्ती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून विकसित भारत घडविण्याचा संदेश मुंबई: भारत हा केवळ भौगोलिक…

1 तास ago

नीट पेपर लीकविरोधात केंद्राच्या कठोर भूमिकेला महाराष्ट्राचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंचे स्वागत

फास्ट ट्रॅक न्यायालये, १० वर्षांपर्यंत कारावास आणि १० कोटी दंडाच्या प्रस्तावित तरतुदींना शिंदेंचा पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या…

1 तास ago

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजे लढ्याचा शेवट नाही; मोदींनी देशाची माफी मागावी; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी…

1 तास ago

नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा तरुणाईच्या संघर्षाचा विजय; सचिन सावंत

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत अखिल भारतीय…

1 तास ago