भिगवण: गेल्या दोन दिवसांपासून भिगवण बाजारपेठेतून तरुणीचे अपहरण झाल्याच्या चर्चेने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणाला आता मोठा ट्विस्ट मिळाला असून संबंधित तरुणी आणि अपहरणाचा आरोप असलेला तरुण दोघेही पोलिसांत हजर झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल ५० तासांनंतर दोघेही रात्री दीड वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाले. तरुणीने यापूर्वी व्हिडिओद्वारे मांडलेली भूमिका कायम ठेवत, “माझे अपहरण झालेले नाही. आमचे एकमेकांवर प्रेम आहे आणि मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत गेले,” असे पोलिसांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
मंगळवारी (१७ फेब्रुवारी) सायंकाळी चारच्या सुमारास भिगवण बाजारपेठ परिसरातून तरुणी आई आणि भावासोबत आली असताना तिचे अपहरण करून मारहाण करण्यात आल्याची तक्रार भिगवण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले. आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाने राजकीय रंगही घेतला होता.
लग्न ठरल्याने घरातून पळाल्याचा दावा
तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिच्या प्रेमसंबंधाची माहिती घरी होती; मात्र कुटुंबीयांनी दुसरीकडे लग्न ठरविल्याने ती संबंधित तरुणासोबत निघून गेली. त्यामुळे अपहरणाचा प्रश्नच येत नसल्याचे ती ठामपणे सांगत आहे.
सध्या पोलिसांकडून दोघांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या घडामोडीनंतर भिगवण परिसरातील तणाव काहीसा निवळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई: मुंबई महानगरपालिका चे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील कथित अनियमितता व संभाव्य…
मुंबई: विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पुणे येथील आय.एल.एस. विधी महाविद्यालयातील बेकायदेशीर शुल्क वसुली प्रकरणी…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथील सालकरमळा परिसरात शेतीच्या नांगरणीवरून दोन गटांमध्ये वाद होऊन…
शिरूर (अरुणकुमार मोटे): पोटगीच्या वादातून संतापाच्या भरात पतीने पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना…
शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्य शासनाच्या महत्त्वाच्या महा-ऑनलाईन पोर्टलचा सर्व्हर गेल्या तीन दिवसांपासून पूर्णपणे बंद असल्याने…
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…