महाराष्ट्र

भिगवण प्रकरणात मोठी घडामोड: तरुण-तरुणी पोलिसात हजर; अपहरण नसून प्रेमप्रकरणाचा दावा

भिगवण: गेल्या दोन दिवसांपासून भिगवण बाजारपेठेतून तरुणीचे अपहरण झाल्याच्या चर्चेने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणाला आता मोठा ट्विस्ट मिळाला असून संबंधित तरुणी आणि अपहरणाचा आरोप असलेला तरुण दोघेही पोलिसांत हजर झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल ५० तासांनंतर दोघेही रात्री दीड वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाले. तरुणीने यापूर्वी व्हिडिओद्वारे मांडलेली भूमिका कायम ठेवत, “माझे अपहरण झालेले नाही. आमचे एकमेकांवर प्रेम आहे आणि मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत गेले,” असे पोलिसांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे.

नेमकं प्रकरण काय?

मंगळवारी (१७ फेब्रुवारी) सायंकाळी चारच्या सुमारास भिगवण बाजारपेठ परिसरातून तरुणी आई आणि भावासोबत आली असताना तिचे अपहरण करून मारहाण करण्यात आल्याची तक्रार भिगवण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले. आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाने राजकीय रंगही घेतला होता.

लग्न ठरल्याने घरातून पळाल्याचा दावा

तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिच्या प्रेमसंबंधाची माहिती घरी होती; मात्र कुटुंबीयांनी दुसरीकडे लग्न ठरविल्याने ती संबंधित तरुणासोबत निघून गेली. त्यामुळे अपहरणाचा प्रश्नच येत नसल्याचे ती ठामपणे सांगत आहे.

सध्या पोलिसांकडून दोघांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या घडामोडीनंतर भिगवण परिसरातील तणाव काहीसा निवळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे

चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…

2 तास ago

जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जावं लागतं का? वाचा ‘हे’ नॉर्मल की एखाद्या आजाराचा संकेत

सकाळी टॉयलेटला जाऊन पोट साफ करणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ही…

4 तास ago

पावसाळ्यात मुंबईत शून्य जिवितहानीचे उद्दिष्ट; यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: पावसाळ्यात मुंबई आणि महानगर परिसरात शून्य जिवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम…

4 तास ago

विद्याधाम विद्यालयात प्रवेशोत्सवाचा उत्साहपूर्ण जल्लोष

शिक्षण सहसंचालक हरून आतार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन पाबळ (सुनिल जिते): नवशैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी कान्हूर मेसाई…

5 तास ago

शिरुर तालुका हादरला; नातवाकडून ८५ वर्षीय वयोवृद्ध आजोबांचा खून

न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…

15 तास ago

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

16 तास ago