अमरावती: राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन महिना उलटला असला तरी काही ठिकाणी सत्तासमीकरणांची जुळवाजुळव अद्याप सुरू आहे. अमरावती महानगरपालिकेत तर स्थायी समिती आणि स्वीकृत सदस्य निवडीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे.
काँग्रेसचे बळ वाढले, वंचितचा पाठिंबा
निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीच्या एका सदस्याने काँग्रेस गटात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे काँग्रेसप्रणीत आघाडीचे संख्याबळ १५ वरून १६ वर पोहोचले आहे. वाढलेल्या संख्याबळामुळे काँग्रेसला आता गणितानुसार दोन स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी ही संधी केवळ एका सदस्यापुरती मर्यादित होती. त्यामुळे स्थायी समितीवरील प्रभाव वाढवण्यात काँग्रेसला मोठा फायदा होणार असल्याचे मानले जात आहे.
ठाकरे गटाचे ‘शिवसेना-बसपा’ आघाडीत विलीनीकरण
दुसरीकडे, शिवसेना (उबाठा) गटातील दोन सदस्यांनी ‘शिवसेना-बसपा’ आघाडीत विलीनीकरण केले आहे. या घडामोडीनंतर संयुक्त गटाची सदस्यसंख्या ८ झाली आहे. मात्र, तांत्रिक गुणांकनानुसार या गटाला केवळ एकच स्वीकृत सदस्य नियुक्त करता येणार आहे.या विलीनीकरणासाठी राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी महत्त्वाची मध्यस्थी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे मागील काही वर्षांपासून एकमेकांविरोधात भूमिका घेणाऱ्या गटांमध्ये नव्या समीकरणांची जुळवाजुळव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्थायी समिती निवड अधिक रंजक
या सर्व राजकीय घडामोडींमुळे अमरावती महापालिकेतील स्थायी समिती सभापती आणि स्वीकृत सदस्य निवडीचा मार्ग अधिकच रंजक बनला आहे. वाढते संख्याबळ, बदलती आघाडी आणि अंतर्गत राजकीय हालचाली यामुळे आगामी निर्णयांकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. महापालिकेतील या नव्या सत्तासमीकरणांमुळे पुढील काही दिवसांत आणखी राजकीय हालचाली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…
मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…
मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…
मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…
महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…