अमरावती: राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन महिना उलटला असला तरी काही ठिकाणी सत्तासमीकरणांची जुळवाजुळव अद्याप सुरू आहे. अमरावती महानगरपालिकेत तर स्थायी समिती आणि स्वीकृत सदस्य निवडीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे.
काँग्रेसचे बळ वाढले, वंचितचा पाठिंबा
निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीच्या एका सदस्याने काँग्रेस गटात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे काँग्रेसप्रणीत आघाडीचे संख्याबळ १५ वरून १६ वर पोहोचले आहे. वाढलेल्या संख्याबळामुळे काँग्रेसला आता गणितानुसार दोन स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी ही संधी केवळ एका सदस्यापुरती मर्यादित होती. त्यामुळे स्थायी समितीवरील प्रभाव वाढवण्यात काँग्रेसला मोठा फायदा होणार असल्याचे मानले जात आहे.
ठाकरे गटाचे ‘शिवसेना-बसपा’ आघाडीत विलीनीकरण
दुसरीकडे, शिवसेना (उबाठा) गटातील दोन सदस्यांनी ‘शिवसेना-बसपा’ आघाडीत विलीनीकरण केले आहे. या घडामोडीनंतर संयुक्त गटाची सदस्यसंख्या ८ झाली आहे. मात्र, तांत्रिक गुणांकनानुसार या गटाला केवळ एकच स्वीकृत सदस्य नियुक्त करता येणार आहे.या विलीनीकरणासाठी राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी महत्त्वाची मध्यस्थी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे मागील काही वर्षांपासून एकमेकांविरोधात भूमिका घेणाऱ्या गटांमध्ये नव्या समीकरणांची जुळवाजुळव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्थायी समिती निवड अधिक रंजक
या सर्व राजकीय घडामोडींमुळे अमरावती महापालिकेतील स्थायी समिती सभापती आणि स्वीकृत सदस्य निवडीचा मार्ग अधिकच रंजक बनला आहे. वाढते संख्याबळ, बदलती आघाडी आणि अंतर्गत राजकीय हालचाली यामुळे आगामी निर्णयांकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. महापालिकेतील या नव्या सत्तासमीकरणांमुळे पुढील काही दिवसांत आणखी राजकीय हालचाली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…
पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…
घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…
व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…
लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…