मुंबई: ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात पहिल्याच आठवड्यात मोठा वाद पाहायला मिळत आहे. स्पर्धक सोनाली राऊतच्या वागणुकीमुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, शोचे होस्ट रितेश देशमुख यांनी तिला कडव्या शब्दांत सुनावलं आहे.
“हा ॲटीट्यूड घरी ठेवायचा, या घरात नाही” असे स्पष्ट शब्दांत सांगत रितेश भाऊंनी शिस्त आणि मर्यादांची आठवण करून दिली.शो सुरू झाल्यापासूनच रितेश भाऊंचा कडक आणि ठाम अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. पहिल्याच आठवड्यात त्यांनी घरातील सदस्यांना स्पष्ट शब्दांत नियम समजावून सांगितले असून, गैरवर्तन करणाऱ्यांची शाळा घेताना ते दिसत आहेत.
टास्क खेळण्यास नकार ठरला कारण
या आठवड्यात कॅप्टन्सी उमेदवारीसाठी ‘शेणाचं दार अन् मेणाचं दार’ हा टास्क देण्यात आला होता. मात्र सोनाली राऊतने हा टास्क खेळण्यास नकार दिला. बिग बॉसच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तिला थेट पुढील आठवड्यासाठी नॉमिनेट करण्यात आले.
रितेश भाऊंचा थेट सवाल
या मुद्द्यावरून रितेश भाऊ चांगलेच संतापले. ते सोनालीला म्हणाले,“तुम्ही ठरवलं की त्या दाराखाली उभं राहायचंच नाही, मग इथे आलात कशाला? टास्क खेळायलाच ना?”यावर सोनालीने “मला जे वाटलं…” असे म्हणण्याचा प्रयत्न केला. मात्र रितेश भाऊंनी तिला मध्येच थांबवत ठाम शब्दांत सुनावलं,“ओ एक मिनिट! हा ॲटीट्यूड तुमच्या घरी ठेवायचा. या घरात नाही. इथे सगळे सारखे आहेत. यावेळी नॉमिनेशन आहे, पुढच्या वेळी थेट घराबाहेर काढेन.”
घरातील वातावरण तापलं
या घटनेनंतर बिग बॉसच्या घरात वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अनुश्री मानेच्या दादागिरीनंतर आता सोनाली राऊतवर झालेली कारवाई चर्चेचा विषय ठरत आहे.रितेश भाऊंच्या कडक भूमिकेमुळे यंदाचा सिझन अधिकच रंगतदार ठरण्याची चिन्हं दिसत आहेत.
शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत…
शिक्रापुर (ओंकार भोरडे) शिरुर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36…
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…
मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…