महाराष्ट्र

मंत्रालयात लाचखोरीचा स्फोट: मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत; ‘रेटकार्ड’चा धक्कादायक दावा

मुंबई: राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारे मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण आता अधिक गंभीर वळणावर पोहोचले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबंधित कामासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असताना संबंधित क्लर्कला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट म्हणून राजू ढेरिंगे यांचा ५० हजारांची मागणी करतानाचा कथित व्हिडिओ समोर आल्याने प्रकरणाची तीव्रता वाढली आहे.

ACB ची मंत्रालयात धडक; कागदपत्रे जप्त

तक्रारदार हरीराम घाणशी यांना सोबत घेऊन ACB पथकाने मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात सखोल चौकशी केली. या दरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे आणि साहित्य ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चौकशीदरम्यान विभागातील कामकाज पद्धती आणि फाईल हालचालींची तपासणी करण्यात आली.

खासगी सचिव कार्यमुक्त

या घडामोडींनंतर मंत्री झिरवळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांना पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रकरणाचे धागेदोरे आणखी वरपर्यंत पोहोचणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

‘रेटकार्ड’चा धक्कादायक दावा

चौकशीदरम्यान मंत्रालयातील कथित लाचखोरीचे ‘रेटकार्ड’ समोर आल्याचा दावा आहे. फाईलवर एक ओळ टाकण्यासाठी ५० हजार रुपये, तर दोन ओळींसाठी १ लाख रुपये अशी मागणी होत असल्याची माहिती समोर येत आहे. या दाव्यांची सत्यता तपासण्याचे काम ACB करत आहे.

आधीही दोन मंत्र्यांचे राजीनामे

याआधी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कराड कनेक्शन उघड झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तसेच नाशिकमधील बोगस कागदपत्र प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचेही मंत्रिपद गेले. त्यामुळे महायुती सरकारमधील हा तिसरा मोठा धक्का ठरणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर दबाव

अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळ आले असताना मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण उघडकीस आल्याने सरकारवर विरोधकांकडून दबाव वाढण्याची शक्यता आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर वर्षभरातच दादांच्या राष्ट्रवादीची तिसरी ‘विकेट’ पडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार झिरवळांना पाठबळ देणार की सरकार कठोर निर्णय घेणार, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ACB च्या पुढील कारवाईकडे राज्याचे लक्ष लागले असून या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

10 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

10 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

11 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

13 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

14 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

15 तास ago