कोल्हापूर: घरगुती वादातून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर रुई येथील पंचगंगा नदीच्या पुलावरून नदीपात्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. या घटनेने रुई पुलावर एकच खळबळ उडाली असून, पट्टणकोडोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पवन अशोक शेंडे (वय ३२, रा. हेगडे गल्ली, पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) असे नदीत उडी घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. पवन इचलकरंजी येथे हातमाग कामगार म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी पवनचा घरात वाद झाला. त्यानंतर तो रागाच्या भरात मोटारसायकल घेऊन घराबाहेर पडला. त्याला बहिणीने अडवण्याचा प्रयत्न केला; मात्र तो मोटारसायकलवरून वेगाने निघून गेला. त्याच्या मनात काही विपरीत विचार असल्याची भीती वाटल्याने बहीण शेजाऱ्याच्या दुचाकीवरून त्याच्या मागे निघाली.
रुई येथील पंचगंगा नदीच्या पुलावर तिने पवनला गाठले. मात्र, बहिणीला पाहताच त्याने मोटारसायकल थांबवली आणि तिच्या डोळ्यांसमोरच नदीपात्रात उडी घेतली. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे तो वाहून गेला.
भावाने डोळ्यांसमोर नदीत उडी घेतल्याचे पाहून बहिणीने मोठा आक्रोश केला. तिचा आवाज ऐकून पुलावरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच पुलावर मोठी गर्दी झाली. नागरिकांनी नदीपात्रात त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
घटनेची माहिती मिळताच हुपरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आपत्कालीन यंत्रणेला माहिती देऊन शोधमोहीम सुरू केली. पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याने पाण्याचा प्रवाह वेगवान होता. त्यामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाले. रेस्क्यू पथकाने इचलकरंजीपर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र नदीची खोली आणि पाण्याचा वेग यामुळे शोधमोहीम आव्हानात्मक ठरली. सायंकाळी अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली.
रक्षाबंधनाची राखी मनगटावरच…
रक्षाबंधनाला अवघे दोन दिवस झाले असताना पवनच्या मनगटावर बहिणीने बांधलेली राखी तशीच होती. ज्या भावाला बहिणीने राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेची कामना केली, त्यानेच तिच्या डोळ्यांसमोर नदीत उडी घेतल्याने तिला मोठा मानसिक धक्का बसला आहे.पवन विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे. घटनेने पट्टणकोडोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
परभणी: मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि इतर सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक…
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला इशारा; ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणत जोरदार…
पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा…
सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून…
निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…
पुणे : जन्म देऊन आयुष्यभर सांभाळ करणाऱ्या आईचीच मुलाने हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील विश्रांतवाडी…