महाराष्ट्र

पुण्यात मुलाकडून आईची निर्घृण हत्या; घरातच दार बंद करून चाकूने हल्ला, विश्रांतवाडीत खळबळ

पुणे : जन्म देऊन आयुष्यभर सांभाळ करणाऱ्या आईचीच मुलाने हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात घडली आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर ३० वर्षीय मुलाने घराचे दार आतून बंद करून आईला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर धारदार चाकूने तिच्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

विश्रांतवाडीतील शांतीनगर झोपडपट्टी परिसरात शनिवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सविता सुरेश हरिभक्त (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे. तर त्यांचा मुलगा अनिकेत सुरेश हरिभक्त (वय ३०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

क्षुल्लक कारणावरून वाद, घराचे दार आतून बंद

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी सविता आणि अनिकेत हे दोघेही घरात होते. दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. सुरुवातीला बाचाबाची झाल्यानंतर वादाचे रूपांतर हिंसक प्रकारात झाले. अनिकेतने घराचे दार आतून बंद करून आईला मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

आईच्या किंकाळ्या ऐकून शेजारी धावले

घरातून सविता यांच्या किंकाळ्यांचा आवाज ऐकू आल्यानंतर शेजाऱ्यांनी तातडीने त्यांच्या घराकडे धाव घेतली. मात्र, घराचे दार आतून बंद असल्याने त्यांना आत जाता येत नव्हते. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच शेजाऱ्यांनी खिडकी तोडून घरात प्रवेश केला.

घरात प्रवेश केल्यानंतर सविता या गंभीर जखमी अवस्थेत आढळल्या. शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती देत त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात

घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अनिकेत हरिभक्त याला ताब्यात घेतले. आरोपी विवाहित असून त्याला दोन लहान मुले असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आई-मुलामध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला? अनिकेतने आईवर एवढा टोकाचा हल्ला का केला? हत्येमागे आणखी काही कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेचा सखोल तपास सुरू असून आरोपीविरोधात पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.या घटनेमुळे कौटुंबिक वादाचे रूप किती टोकाला जाऊ शकते, याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला असून विश्रांतवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिर्डीत पराभव झाला नसता तर आजही शरद पवारांसोबत असतो; रामदास आठवले यांची खंत

पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा…

45 मिनिटे ago

डीसीसी निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार? सुभाष देशमुखांचा ठराव; शहाजी पवारही मैदानात

सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून…

50 मिनिटे ago

भावाची प्रकृती पाहण्यासाठी गेले; भेट ठरली अखेरची! एकाच दिवशी सख्ख्या भावांचा मृत्यू

निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…

56 मिनिटे ago

गांधी नकोत, पण गांधींचा चष्मा हवा!

परदेशात ‘ब्रँड इंडिया’, देशात गांधीविरोध; हा राजकारणाचा दुटप्पीपणा की सोयीचा इतिहास? मुंबई: महात्मा गांधींचे नाव…

4 तास ago

गोकुळच्या निवडणुकीआधी महायुतीत धुसफूस; मुश्रीफ-महाडिक गटाचा संघर्ष टोकाला

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक…

1 दिवस ago

गडचिरोलीच्या विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संपत्ती लुटण्याचा डाव; वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

गडचिरोली: उद्योगांच्या माध्यमातून गडचिरोलीचा कायापालट करण्याच्या घोषणा सत्ताधाऱ्यांकडून केल्या जात असल्या, तरी जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, रस्ते,…

1 दिवस ago