महाराष्ट्र

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात घरगणना करण्यात येणार असून कुटुंबातील भौतिक सुविधांची माहिती ३३ प्रश्नांच्या माध्यमातून नोंदवली जाणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने स्वतःची माहिती भरण्याची ‘स्व-गणना’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

१ मे ते १५ मे या कालावधीत नागरिक मोबाईल किंवा संगणकाद्वारे अधिकृत संकेतस्थळावर जाऊन कुटुंबाची माहिती भरू शकतात. एका कुटुंबाने एकच अर्ज भरायचा असून सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे आवश्यक आहे. कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नसून फॉर्म पूर्ण झाल्यानंतर ११ अंकी युनिक आयडी दिला जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात, १५ मे ते १४ जून दरम्यान प्रगणक घरोघरी भेट देऊन ऑनलाइन भरलेल्या माहितीची पडताळणी करतील. ज्यांनी स्व-गणना केलेली नाही, त्यांची माहिती प्रगणकांकडून नव्याने नोंदवली जाईल. नागरिकांनी आधीच माहिती भरलेली असल्यास, फक्त युनिक आयडी दाखवून पडताळणी पूर्ण करता येईल.

दरम्यान, नागरिकांनी फक्त अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. डिजिटल प्रक्रियेद्वारे जनगणना अधिक सोपी आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक : महायुतीचा दणदणीत विजय, 17 पैकी 16 जागांवर कब्जा

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महायुतीने मोठे यश संपादन करत 17…

46 मिनिटे ago

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक; लवकरच दिलासादायक निर्णय होणार

मुंबई: राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून मानधन, सेवा संरक्षण आणि प्रशासकीय अधिकारांसंदर्भातील…

51 मिनिटे ago

शिंदेंचा ‘षटकार’; ठाकरे गटातील सहा खासदार शिवसेनेत दाखल

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सोमवारी मोठी घडामोड घडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा विद्यमान खासदारांनी…

13 तास ago

माहिती अधिकारावर सरकारचा घाला; बेकायदेशीर तरतुदी तात्काळ रद्द करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: माहितीचा अधिकार (RTI) हा नागरिकांना शासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी मिळालेला महत्त्वाचा…

17 तास ago

ओबीसी जनगणनेत स्वतंत्र कॉलम नसल्यास राज्यभर आंदोलन; विजय वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या देशासमोर यावी यासाठी होणाऱ्या जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करणे…

17 तास ago

देशाचे पहिले शक्तीपीठ मोदी, दुसरे शक्तीपीठ अमित शाह; एकनाथ शिंदे

इचलकरंजी: देशाच्या राजनैतिक शक्तीपीठांचा विचार केला तर पहिले शक्तीपीठ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे…

17 तास ago