मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात घरगणना करण्यात येणार असून कुटुंबातील भौतिक सुविधांची माहिती ३३ प्रश्नांच्या माध्यमातून नोंदवली जाणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने स्वतःची माहिती भरण्याची ‘स्व-गणना’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
१ मे ते १५ मे या कालावधीत नागरिक मोबाईल किंवा संगणकाद्वारे अधिकृत संकेतस्थळावर जाऊन कुटुंबाची माहिती भरू शकतात. एका कुटुंबाने एकच अर्ज भरायचा असून सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे आवश्यक आहे. कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नसून फॉर्म पूर्ण झाल्यानंतर ११ अंकी युनिक आयडी दिला जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात, १५ मे ते १४ जून दरम्यान प्रगणक घरोघरी भेट देऊन ऑनलाइन भरलेल्या माहितीची पडताळणी करतील. ज्यांनी स्व-गणना केलेली नाही, त्यांची माहिती प्रगणकांकडून नव्याने नोंदवली जाईल. नागरिकांनी आधीच माहिती भरलेली असल्यास, फक्त युनिक आयडी दाखवून पडताळणी पूर्ण करता येईल.
दरम्यान, नागरिकांनी फक्त अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. डिजिटल प्रक्रियेद्वारे जनगणना अधिक सोपी आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.…
पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे,…
बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…