महाराष्ट्र

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात घरगणना करण्यात येणार असून कुटुंबातील भौतिक सुविधांची माहिती ३३ प्रश्नांच्या माध्यमातून नोंदवली जाणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने स्वतःची माहिती भरण्याची ‘स्व-गणना’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

१ मे ते १५ मे या कालावधीत नागरिक मोबाईल किंवा संगणकाद्वारे अधिकृत संकेतस्थळावर जाऊन कुटुंबाची माहिती भरू शकतात. एका कुटुंबाने एकच अर्ज भरायचा असून सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे आवश्यक आहे. कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नसून फॉर्म पूर्ण झाल्यानंतर ११ अंकी युनिक आयडी दिला जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात, १५ मे ते १४ जून दरम्यान प्रगणक घरोघरी भेट देऊन ऑनलाइन भरलेल्या माहितीची पडताळणी करतील. ज्यांनी स्व-गणना केलेली नाही, त्यांची माहिती प्रगणकांकडून नव्याने नोंदवली जाईल. नागरिकांनी आधीच माहिती भरलेली असल्यास, फक्त युनिक आयडी दाखवून पडताळणी पूर्ण करता येईल.

दरम्यान, नागरिकांनी फक्त अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. डिजिटल प्रक्रियेद्वारे जनगणना अधिक सोपी आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कुर्ला भूस्खलन दुर्घटना : बाधित कुटुंबांना ४ लाखांची मदत; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सचिन अहिर आक्रमक

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…

3 तास ago

१,२३१ अनुदानित महाविद्यालयांचे कामकाज आता डिजिटल; ‘ई-ऑफिस प्रणाली’चे लोकार्पण

मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…

3 तास ago

विद्यार्थ्यांच्या सूचनांचे चंद्रकांत पाटलांकडून स्वागत; परीक्षा सुरक्षेसह सामाजिक प्रश्नांवर थेट संवाद

मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…

3 तास ago

महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी; फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…

3 तास ago

घोडगंगा कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय

शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…

3 तास ago

रूसा, पीएम उषा प्रकल्पांना गती द्या; विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेत मिळाव्यात; चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…

5 तास ago