औरंगाबाद: औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाला राज्य आणि केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर शहरातील अनेक ठिकाणी औरंगाबाद नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे लिहिण्यात येत आहे. तर शहरातील शासकीय कार्यालयावरील फलकाचे नावं देखील बदलली जात आहे.
मात्र महानगरपालिकेवरील नाव औरंगाबाद असल्याने मोठ्या प्रमाणात टीका होत होती. दरम्यान आता महापालिका प्रशासनाने देखील औरंगाबाद नाव असलेलं फलक काढले आहे. मात्र असे असतानाच महानगरपालिकेच्या इमारतीवर असलेल्या फलकावर ‘छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर’ असे नाव असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र प्रत्यक्षात हा फोटो फेक असून. अजूनही नवीन नावाचे बोर्ड लावण्यात आला नाही.
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…
नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…
मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…