महाराष्ट्र

मुख्यमंत्री, उशीर झाला! नाशिक भोंदू बाबा प्रकरणात चौकशीची मागणी; महिला आयोगावरही प्रश्नचिन्ह

 

नाशिक : राज्यात चैत्र नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या कथित भोंदू बाबा प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. अंधश्रद्धा, महिलांचे कथित शोषण आणि त्याला मिळालेल्या संभाव्य राजकीय आश्रयामुळे राज्यातील वातावरण तापले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

नाशिकमध्ये अशोक खरात या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचा दावा केला जात आहे. त्याच्या कथित कृतींमुळे समाजात संतापाची लाट उसळली असून अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आल्याने वाद अधिकच वाढला आहे. संबंधित मंदिर ट्रस्टशी त्यांचा संबंध असल्याचा आरोप होत असून, त्यांनी संवैधानिक पदाचा वापर केला का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

याचबरोबर, या प्रकरणाची बातमी प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारावर दबाव टाकून माफी मागण्यास भाग पाडल्याचा आरोपही पुढे आला आहे. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतही गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मात्र चौकशी किती पारदर्शक होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून या प्रकरणात संबंधित सर्वांची चौकशी करण्याची मागणी होत आहे. केवळ राजीनामा पुरेसा नसून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, तसेच पीडित महिलांना न्याय मिळावा, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, संत संत एकनाथ यांच्या शिकवणीतून समाजातील ढोंगीपणावर प्रहार करण्यात आला होता. आजही अशा घटनांमुळे त्या विचारांची प्रासंगिकता अधोरेखित होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.राज्य सरकार आणि गृहमंत्रालयासाठी हे प्रकरण मोठी कसोटी ठरणार असून, महाराष्ट्रातील सुजाण आणि प्रगत परंपरेला धक्का बसू नये यासाठी तातडीने कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसूण कच्चा खावा की भाजून खावा

लसणाचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच शरीराला अनेक…

54 मिनिटे ago

ग्रामीण-शहरी वाद नव्हे, तरुणाईच्या एकतेतूनच घडेल सक्षम महाराष्ट्र; दिनेश शिंदे

मुंबई: राज्यातील स्पर्धा परीक्षांबाबत ग्रामीण आणि शहरी तरुणाईमध्ये तुलना करण्याऐवजी त्यांच्या सामर्थ्यांचा संगम घडवून महाराष्ट्राच्या…

1 तास ago

कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; बिगर-काश्मिरी मजुरावर गोळीबार, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

सुरक्षा दलांचे मोठे सर्च ऑपरेशन सुरू; हल्लेखोरांचा शोध सुरू जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या कुलगाम…

2 तास ago

सिंहस्थातून घडणार पुढील १०० वर्षांचा नाशिक; ३२ हजार कोटींच्या विकास आराखड्याची शिंदेंची घोषणा

स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, २०२७ सिंहस्थासाठी अत्याधुनिक नियोजन; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनाची तयारी मुंबई: सिंहस्थ कुंभमेळा…

2 तास ago

जनतेच्या विश्वासाचा सन्मान करत महायुती सरकार स्थापन; विकासालाच प्राधान्य; दिनेश शिंदे

२०१९ च्या जनादेशाचा सन्मान, २०२२ मधील राजकीय बदल आणि विकासाभिमुख प्रशासनावर भर मुंबई: २०१९ च्या विधानसभा…

2 तास ago

अण्णाभाऊ साठे जयंतीकडे सांस्कृतिक विभागाची पाठ?; विशेष कार्यक्रम नसल्याने कलाक्षेत्रात नाराजी

मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बळ देणारे, वंचित-शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहिर तथा…

2 तास ago