औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) फेब्रुवारी–मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी बारावीचे प्रवेशपत्र येत्या सोमवारपासून, म्हणजेच १२ तारखेपासून उपलब्ध होणार आहेत.
हॉल तिकीट कुठे आणि कसे मिळणार
सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिली जाणार आहेत
अधिकृत संकेतस्थळ : www.mahahsscboard.in
सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
शाळा / महाविद्यालयांसाठी महत्त्वाच्या सूचना
शाळा व महाविद्यालयांनी प्रवेशपत्राची छायांकित प्रत काढून विद्यार्थ्यांना द्यावी
प्रवेशपत्र देताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये
प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक / प्राचार्य यांचा शिक्का व स्वाक्षरी असणे आवश्यक
हॉल तिकीटवरील फोटोबाबत सूचना
प्रवेशपत्रावरील छायाचित्र स्पष्ट नसल्यास
विद्यार्थ्याचे नवीन छायाचित्र चिकटवावे
त्यावर मुख्याध्यापक / प्राचार्य यांचा शिक्का व स्वाक्षरी करावी
हॉल तिकीट हरवल्यास काय कराल
हॉल तिकीट गहाळ झाल्यास
शाळा / महाविद्यालयाने पुन्हा छायांकित प्रत द्यावी
त्या प्रतीवर लाल शाईने “द्वितीय प्रत” असा शेरा द्यावा
बारावी परीक्षेचे वेळापत्रक
लेखी परीक्षा (सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम): १० फेब्रुवारी ते १८ मार्च
प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन
२३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी
एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांचाही समावेश
विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेशपत्र मिळवून सर्व तपशील काळजीपूर्वक तपासावेत आणि परीक्षेच्या तयारीला लागवे.
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…