मुंबई: मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, या मागणीसाठी राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार आहेत. या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंबा येथे मनोज जरांगे पाटील यांची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीप्रसंगी भाषण करताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. येत्या 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा घेऊन जाण्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
राज्यभरात 27 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या काळात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) मोर्चा घेऊन आले तर मोठा जनसमुदाय मुंबईत दाखल होऊ शकतो. यामुळे यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मनोज जरांगे यांचे आंदोलन स्थगित व्हावे, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी रविवारी मांजरसूंबा येथे सभा घेत येत्या 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा घेऊन जाण्यावर आपण ठाम असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
मराठा समाजासाठी महायुती सरकारने केलेले काम सर्वांना माहिती आहे. मराठा समाजाला आरक्षण देणारे आमचे सरकार आहे. मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना, त्यानंतर शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले आहे. ते आरक्षण सुरु आहे. आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दीड लाख मराठा उद्योजक तयार केले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी खूप मोठ्या प्रमाणात काम केले आहे. पुढेही आम्ही काम करणार आहोत. त्यामुळे या संदर्भात कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. पण लोकशाही मार्गाने कुणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घेऊ, अशी भूमिका सीएम फडणवीस यांनी मांडली आहे.
महायुती सरकारच्या काळात मराठा समाजासाठी शिक्षणाची व्यवस्था केली आहे. मराठा समाजाच्या मुलांना राहण्यासाठी आपण त्यांना भत्ता देण्याची योजना सुरु केली आहे. आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाज जास्तीत जास्त आला पाहिजे, यासाठी सारथी सारख्या संस्थेसोबत आपण काम केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अनेक आयएएस अधिकारी सारथीच्या माध्यमातून तयार केले आहेत. सारथीच्या माध्यमातून अनेक एमपीएससीचे विद्यार्थी तयार केले आहेत,’ असा दावा सीएम फडणवीस यांनी केला.
शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत…
शिरूर : शिरूर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36 तासांत…
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…
मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…