महाराष्ट्र

अजित पवार यांच्यासह माजी सदस्यांवरील शोकप्रस्ताव; दुःख एका पक्षाचे नसते, सभागृहात भावनिक वातावरण

मुंबई: महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सुरुवात भावनिक वातावरणात झाली. प्रथेनुसार पहिल्याच दिवशी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करत शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित अनंतराव पवार यांच्यासह माजी मंत्री सुरुपसिंग नाईक , माजी विधान परिषद सदस्य अशोक मोदक , गंगाधर पाटणे आणि नीला देसाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. १९९१ पासून परिचय आणि २००२ पासून विधान परिषदेत एकत्र काम करताना अनुभवलेल्या अनेक प्रसंगांचा त्यांनी उल्लेख केला. विरोधी पक्षात असतानाही जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे आणि निधीअभावीही सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, ही त्यांची कार्यपद्धती असल्याचे त्यांनी सांगितले.

लवासा परिसरातील गावांना वीजपुरवठा मिळावा यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेतल्याचा प्रसंगही त्यांनी कथन केला. २०१९ मध्ये उपसभापतीपदी बिनविरोध निवडीवेळी मिळालेले सहकार्य तसेच कोविड काळात रुग्णालयांच्या बिलांसंदर्भात दिलेली मदत यांचाही त्यांनी उल्लेख केला.

“राजकारणात भूमिका वेगळ्या असू शकतात; मात्र समाजकारणात सर्वसमावेशक दृष्टिकोन असावा, ही अजितदादांची भूमिका होती,” असे त्या म्हणाल्या. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्व आमदारांचे मुद्दे संयमाने ऐकून घेण्याची त्यांची शैली उल्लेखनीय होती, असेही त्यांनी नमूद केले.

इतर दिवंगत नेत्यांबाबत बोलताना सुरूपसिंग नाईक यांनी नंदुरबार-नवापूर भागातील आर्थिक विकास आणि व्यसनमुक्ती क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याचे सांगण्यात आले. अशोक मोडक यांनी ऐतिहासिक स्मारकांच्या विषयांवर सातत्याने भूमिका मांडली. गंगाधर पटने यांनी ग्रंथालय चळवळ उभी करण्यात योगदान दिले, तर शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदारांपैकी नीला देसाई प्रभावी वक्त्या आणि आक्रमक नेतृत्वासाठी ओळखल्या जात होत्या.

शोकप्रस्तावादरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी पवार कुटुंबीयांनी दाखवलेल्या संयमाचे कौतुक केले. “दुःख एका पक्षाचे नसते; संपूर्ण महाराष्ट्राने एकत्र राहण्याची गरज आहे,” असे आवाहन करत त्यांनी वैयक्तिक दुःखावर सार्वजनिक टीका करणे अयोग्य असल्याचे स्पष्ट केले.अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात दाटलेले भावनिक वातावरण आणि अजितदादांच्या आठवणींनी सर्वपक्षीय सदस्यांना एकत्र आणल्याचे चित्र पाहायला मिळाले

शिरूर तालुका टीम

Recent Posts

खरीप आढावा बैठकीत ‘इंटिग्रेटेड गाव विकास मॉडेल’ची मांडणी

ठाणे: उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत केवळ कृषीपुरते मर्यादित न राहता “इंटिग्रेटेड…

1 तास ago

59 ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन

ठाणे: जवळपास 9500 विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या 59 ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला भेट…

1 तास ago

मुंबईत ‘खड्डेमुक्ती’वर ९० कोटींचा प्रश्नचिन्ह; अनियमिततेच्या आरोपांवरून प्रशासनाला निवेदन

मुंबई: मुंबई महानगरपालिका चे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील कथित अनियमितता व संभाव्य…

5 तास ago

पुण्यातील ILS विधी महाविद्यालय शुल्क वसुली प्रकरणी चौकशी; विद्यार्थ्यांना 6% व्याजासह परतावा

मुंबई: विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पुणे येथील आय.एल.एस. विधी महाविद्यालयातील बेकायदेशीर शुल्क वसुली प्रकरणी…

5 तास ago

शेतीच्या वादातून चांडोह येथे हाणामारी; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथील सालकरमळा परिसरात शेतीच्या नांगरणीवरून दोन गटांमध्ये वाद होऊन…

6 तास ago

पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला; पतीविरुद्ध शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): पोटगीच्या वादातून संतापाच्या भरात पतीने पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना…

6 तास ago