बदलापूर बीजांड विक्री रॅकेट प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल
मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बदलापूर येथे उघडकीस आलेल्या महिलांच्या बीजांड (Oocytes) विक्री रॅकेट प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना निवेदन दिले आहे.
बदलापूर येथील जोवेली परिसरात पोलीस कारवाईदरम्यान आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या महिलांना लक्ष्य करून त्यांच्या शरीरातून कृत्रिमरीत्या बीजांड काढून त्यांची बेकायदेशीर विक्री करणारे संघटित रॅकेट उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेला मानवी तस्करीचा आणि महिलांच्या प्रजनन अधिकारांवरील गंभीर आघाताचा स्वरूप असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, यापूर्वीही त्यांनी विधानपरिषदेत सरोगसी प्रक्रियेतील महिलांच्या शारीरिक शोषणाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. तसेच महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी चंद्रशेखर धर्माधिकारी समितीने दिलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची मागणी सातत्याने केली होती. बदलापूरमधील घटना ही त्या शिफारशींच्या उल्लंघनाचे उदाहरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्राथमिक तपासानुसार या रॅकेटचे धागेदोरे नाशिक, नागपूर तसेच तेलंगणा आणि बंगळुरू पर्यंत पसरले असल्याची माहिती समोर येत आहे. सुमारे ३०० हून अधिक महिलांचे शोषण झाले असून काही मोठी रुग्णालये आणि डॉक्टरांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्त्री आधार केंद्र च्या माध्यमातून महिलांच्या हक्कांसाठी काम करताना अशा प्रकारच्या घटनांविरोधात कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या निवेदनाद्वारे डॉ. गोऱ्हे यांनी या गुन्ह्याच्या आंतरराज्यीय स्वरूपाचा विचार करून तातडीने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी केली आहे.
तसेच संबंधित रुग्णालयांचे परवाने रद्द करणे, दोषी डॉक्टरांवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करणे, धर्माधिकारी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे आणि बीजांड दान व सरोगसी प्रक्रियेवर कडक मानक कार्यपद्धती (SOP) तयार करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. महिलांच्या आरोग्याशी आणि अस्मितेशी खेळणाऱ्या अशा माफियांवर शासनाने कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…