महाराष्ट्र

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल

मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी झाल्यानंतर काँग्रेस व इंडिया आघाडीतील खासदारांकडून वस्तुस्थितीचा विपर्यास करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याची टीका विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

एका महिला खासदारांनी माध्यमांमध्ये Rajiv Gandhi यांनी १९८८ सालीच महिला आरक्षण दिल्याचा दावा केल्याचा संदर्भ देत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, त्या काळात अशा प्रकारचे कोणतेही विधेयक अस्तित्वात नव्हते. “१९८३-८४ पासून मी महिला चळवळीत कार्यरत आहे. १९८८ मध्ये ‘नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन’च्या बैठका झाल्या होत्या, मात्र महिला आरक्षणाचा कायदा तेव्हा आलेलाच नव्हता,” असे त्यांनी स्पष्ट केले.

महिलांना सर्व स्तरांवर एक तृतीयांश आरक्षण मिळावे यासाठी देशभरात दीर्घकाळ संघर्ष झाला. त्यातूनच १९९२-९३ मध्ये ७३ वी व ७४ वी घटनादुरुस्ती मंजूर झाली, असे त्यांनी नमूद केले. मात्र १९९६ ते २०२३ या काळात काँग्रेसने महिला आरक्षणाबाबत ठोस राजकीय इच्छाशक्ती दाखवली नाही, असा आरोप त्यांनी केला.

“आज महिलांची सहानुभूती मिळवण्यासाठी काँग्रेसकडून ‘पुतना मावशीचे प्रेम’ दाखवले जात आहे. महिलांनी हा डाव ओळखला पाहिजे,” असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनीही काँग्रेस, समाजवादी पक्ष व इंडिया आघाडीतील पक्षांच्या भूमिकेवर टीका केली आहे. महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका घेणाऱ्या या पक्षांनी महिलांच्या न्यायाच्या लढ्याला वारंवार धक्का दिला असल्याचे त्यांनी नमूद केले.

शहाबानो प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला, तर पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम महिलांना कायदेशीर हक्क मिळवून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगताना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्लीतील ‘तंदूर कांड’ तसेच लातूरमधील कल्पना गिरी प्रकरणाचा उल्लेख केला.

एनडीए सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असून, Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “महिलांना न्याय व सन्मान मिळवून देण्यासाठी एनडीए, शिवसेना आणि महायुतीतील पक्षांचा लढा कायम राहील,” असे त्यांनी शेवटी नमूद केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कुर्ला भूस्खलन दुर्घटना : बाधित कुटुंबांना ४ लाखांची मदत; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सचिन अहिर आक्रमक

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…

8 तास ago

१,२३१ अनुदानित महाविद्यालयांचे कामकाज आता डिजिटल; ‘ई-ऑफिस प्रणाली’चे लोकार्पण

मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…

8 तास ago

विद्यार्थ्यांच्या सूचनांचे चंद्रकांत पाटलांकडून स्वागत; परीक्षा सुरक्षेसह सामाजिक प्रश्नांवर थेट संवाद

मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…

8 तास ago

महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी; फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…

8 तास ago

घोडगंगा कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय

शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…

8 तास ago

रूसा, पीएम उषा प्रकल्पांना गती द्या; विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेत मिळाव्यात; चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…

10 तास ago