मुंबई: Indian National Congress पक्षाने राज्यभर सुरू असलेल्या “संघटन सृजन अभियान” अंतर्गत जिल्हाध्यक्ष नियुक्त्यांमध्ये व्यापक सोशल इंजिनिअरिंगचा अवलंब करत सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक समतोल, स्थानिक नेतृत्वाची स्वीकारार्हता, संघटनात्मक क्षमता आणि पक्षविस्ताराची ताकद या निकषांवर आधारित ६९ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने ही नियुक्ती प्रक्रिया अत्यंत व्यापक पद्धतीने राबवली होती. पक्षाने नियुक्त केलेल्या वरिष्ठ निरीक्षकांनी प्रत्येक जिल्ह्यात जवळपास दहा दिवस मुक्काम करत पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी पदाधिकारी, स्थानिक नेते आणि विविध समाजघटकांशी संवाद साधला. जिल्हानिहाय संघटनात्मक परिस्थिती, सामाजिक प्रतिनिधित्व, जनाधार आणि स्थानिक नेतृत्वाची ताकद यांचा अभ्यास करून निरीक्षकांनी आपला अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर केला होता.या शिफारसींना Mallikarjun Kharge यांनी अंतिम मान्यता दिल्यानंतर नियुक्त्या अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या.
नियुक्त करण्यात आलेल्या ६९ जिल्हाध्यक्षांमध्ये विविध समाजघटकांना पुढीलप्रमाणे प्रतिनिधित्व देण्यात आले आहे
ओपन प्रवर्ग – २४
ओबीसी – २२
अल्पसंख्याक – ७
अनुसूचित जाती (SC) – ७
अनुसूचित जमाती (ST) – ३
VJNT – २
महिला – ३
या नियुक्त्यांमध्ये आगरी, धनगर, कोमटी, कोष्टी, कुणबी, लेवा पाटील, लिंगायत, माळी, तेली अशा विविध ओबीसी समाजघटकांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आली आहे. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गात बौद्ध, मातंग आणि हिंदू खाटीक समाजाचाही समावेश करण्यात आला आहे. अल्पसंख्याक समाजातून मुस्लिम समाजालाही महत्त्वपूर्ण प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
प्रदेशाध्यक्ष Harshwardhan Sapkal यांनी राज्यातील निरीक्षकांवर तालुकास्तरावर संघटन उभारणीची जबाबदारी सोपवली होती. निरीक्षकांनी विविध तालुक्यांमध्ये जाऊन स्थानिक पदाधिकारी, आघाड्या आणि सेल संघटनांशी संवाद साधत संघटनात्मक आढावा घेतला. त्यानंतर रिक्त असलेल्या तालुकाध्यक्ष तसेच विभाग, आघाडी आणि सेल संघटनांच्या पदांवर नियुक्त्या सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यभरात सुमारे सात हजार नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
नियुक्त जिल्हाध्यक्षांचे सरासरी वय सुमारे ५० वर्षे असून अनुभवी नेतृत्वासोबत नव्या पिढीलाही संधी देण्याचा प्रयत्न या प्रक्रियेत दिसून येत आहे. काँग्रेसच्या या संघटनात्मक पुनर्बांधणीमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष सर्व समाजघटकांना सोबत घेऊन पुढे जात असल्याचा संदेश दिला जात आहे.
मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या गेल्या १२ वर्षांच्या सत्ताकाळाच्या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि प्रदीप गुप्ता…
नवी दिल्ली : केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलिंडर अनुदानाच्या नियमांमध्ये मोठे बदल करत सबसिडी वितरण…
मुंबई: इराण-अमेरिका संघर्षामुळे गेल्या काही आठवड्यांपासून तणावाच्या केंद्रस्थानी असलेल्या होर्मुज खाडीत आता पुन्हा जहाजांची ये-जा…
पाऊस आला की, थंड थंड सरींमध्ये भिजण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. लहान मुले असो वा…
वाढतं वय आणि तणावामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते उच्च रक्त दाबाला सायलेंट किलरही म्हणतात.…
मुंबई: महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन राज्यातील…