मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून आला आहे. बदलीच्या दिवशीच त्यांनी ‘पॉवर प्ले’ करत जिल्ह्यातील सहा ते सात पोलीस अधिकाऱ्यांच्या कथित नियमबाह्य बदल्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून शिवसेना सातारा जिल्ह्याने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली आहे. यासोबतच राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रियेपासूनच तुषार दोषी यांची कारकीर्द वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटले होते आणि राज्यभर चर्चा रंगली होती. परिस्थिती गंभीर झाल्याने राज्य सरकारला त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे लागले होते.
यानंतर शासनाने त्यांची साताऱ्यातून सांगली येथे बदली केली. मात्र बदलीच्या दिवशीच त्यांनी अधिकाराचा कथित गैरवापर करत काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियमांनुसार बदली झालेल्या अधिकाऱ्याला अशा प्रकारचे प्रशासकीय निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर सातारा शिवसेनेने सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसेच पर्यटन मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडेही निवेदन सादर करण्यात आले आहे.“हा प्रकार अत्यंत गंभीर असून याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांनी केली आहे.
मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…
मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…
मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…
मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…
शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…
मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…