मुंबई: मुंबई उच्च न्यायालयानं माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसची धडाडती तोफ धनंजय मुंडे यांच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यात मोठा दिलासा दिला होता. पण या निकालानंतर 48 तासांच्या आतच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा मुंडेंविरोधात तलवार उपसली आहे. त्यांनी धनंजय मुंडेंना कोणतीही क्लिन चीट मिळाली नसल्याचं ठणकावलं आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कृषी विभागातील घोटाळ्याप्रकरणी दिलेल्या निकालानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी आपण या प्रकरणी थेट आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा दिला आहे.
त्या म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांना विनंती करते की, धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये वापसी करू नये. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की, पहिले धनंजय मुंडे आणि नंतर माणिकराव कोकाटे यांच्यासारखे कृषिमंत्री झाले. पण मुंबई उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांची चुकीची मांडणी, सरकारी वकिलांचा घोळ, यामुळे सगळं मुंडेंच्या पथ्यावर पडलं असल्याची संतप्त प्रतिक्रिया दमानिया यांनी दिली आहे.घोटाळ्यात अटक केलेला अमित साळुंके शिंदे पिता-पुत्राचा निकटवर्तीय, संजय राऊतांचा धक्कादायक दावा
मुंबई उच्च न्यायालयानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडेंविरोधात कृषी विभागातील झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दोन्हीही याचिका फेटाळल्यानंतर अंजली दमानिया आता आणखी आक्रमक झाल्या आहेत. त्या म्हणाल्या, परवा संध्याकाळी हायकोर्टाने ऑर्डर पास केली आहे. मला यामध्ये काय त्रुटी वाटत आहेत त्या मी मांडणार आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत,असंही त्यांनी सांगितलं.
तसेच शासनाकडचे जे वकील होते, त्यांनी अतिशय शातीरपणे सगळं मांडलं. जे दोन जीआर होते, वेगवेगळ्या विभागाचे आहेत, असंही दमानिया यांनी म्हटलं. वकिलांनी न्यायालयात जे सगळं मांडलं ते चुकीचं आहे. या प्रकरणांमध्ये भ्रष्टाचाराचा कुठेही उच्चारही केला नाही. या वकिलांकडून भ्रष्टाचाराचा अँगल कुठेही मांडला गेलेला नाही. यामुळे धनंजय मुंडेंना क्लीन चीट मिळालेली नसल्याचंही त्यांनी ठणकावलं आहे.
दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना या संपूर्ण प्रकरणी चॅलेंज करायची गरज असल्याची भूमिकाही मांडली. त्या म्हणाल्या, सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय मांडण्याची गरज आहे. माझा लढा लोक आयुक्तांसमोर चालू आहे. सत्यमेव जयते हे धनंजय मुंडे यांना शोभत नाही. वी राधा ज्या सचिव होत्या, त्यांचा अहवाल कधीही मांडण्यात आला नाही. त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. आठवेळा सचिवाने हे सर्व चुकीचं होतं असल्याचं सांगितल्याचंही दमानिया यावेळी म्हणाल्या. .
भाजप आमदार सुरेश धस यांनी तब्बल 200 कोटींचा तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे हे कृषिमंत्री असताना सुमारे 245 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र,मुंबई उच्च न्यायालयानं मुंडेंना दिलासा देताना त्यांच्या कार्यकाळात राज्य सरकारच्या कृषी विभागानं केलेल्या कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणाच्या निर्णय हा नियमानुसार झाल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
प्रश्न: मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडेंना क्लीन चीट दिली का?
उत्तर: न्यायालयाने याचिका फेटाळल्या पण ‘क्लीन चीट’ दिली असल्याचे स्पष्टपणे नमूद केलेले नाही.
प्रश्न: अंजली दमानिया पुढे काय करणार आहेत?
उत्तर: त्या या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे जाहीर केलं आहे.
प्रश्न: कोणत्या मुद्द्यावरून दमानिया नाराज आहेत?
उत्तर: सरकारी वकिलांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा न्यायालयात मांडलाच नाही, यामुळे त्या नाराज आहेत.
प्रश्न: धनंजय मुंडेंवर नेमका आरोप काय आहे?
उत्तर: कृषी मंत्री असताना सुमारे 245 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे.
मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…
जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…
छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…
मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…
पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…
पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…