मुंबई: गेल्या आठवड्यात विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यापासून राज्यात विविध राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे कथितपणे सभागृहात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर विविध स्तरांतून टीका होत आहे. तसेच अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनीही टिप्पणी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) रोहित पवार यांनी काल ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये रोहित पवारांनी राज्यात ६००० कोटींचा आरोग्य घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. रोहित पवार यांच्या या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, राज्यात अनेक ठिकाणी पावसाने पुन्हा हजेरी लावली असून, पुढील ३-४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा देण्यात आला आहे.
पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…
नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…