महाराष्ट्र

संगमनेरसाठी स्वतंत्र RTOच्या मागणीला वेग; मंत्री सरनाईकांकडून प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश

मुंबई: संगमनेरसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) स्थापनेच्या मागणीला पुन्हा गती मिळाली आहे. यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांची मुंबईत भेट घेऊन संगमनेर, अकोले आणि परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी नव्या शासन निकषांनुसार स्वतंत्र RTO कार्यालयास मंजुरी देण्याची मागणी केली.

परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. नव्या शासन अध्यादेशातील निकषांनुसार संगमनेरसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा प्रस्ताव लवकरात लवकर तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

संगमनेर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी, शैक्षणिक आणि वाहतूक केंद्र असून वाहन नोंदणी, परवाने, कर भरणा आणि इतर परिवहन सेवांसाठी संगमनेर, अकोले व परिसरातील नागरिकांना दूरच्या RTO कार्यालयांमध्ये जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अपव्यय होत असल्याने स्वतंत्र कार्यालयाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

आमदार सत्यजीत तांबे यांनी या मागणीसाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला आहे. मार्च २०२५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही ही मागणी करण्यात आली होती. त्यावेळी स्वतंत्र RTO ऐवजी कॅम्प कार्यालय मंजूर झाले होते. तसेच जुलै २०२५ च्या पावसाळी अधिवेशनातही त्यांनी विधान परिषदेत हा मुद्दा प्रभावीपणे उपस्थित केला होता.

तांबे यांनी सांगितले की, संगमनेर आणि परिसरातील लाखो नागरिकांना अधिक सुलभ व कार्यक्षम परिवहन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत उपोषण; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षा CBT (Computer Based Test) पद्धतीने घेण्याच्या आणि Normalization…

1 तास ago

‘व्हीबी-जीरामजी’मुळे ग्रामीण विकासाला नवी गती; रोजगार हमीचे १२५ दिवस, ३१८ कामांचा समावेश

मुंबई: विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात बुधवारी 'विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण)…

1 तास ago

महायुती सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले; सर्व मोठ्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका जाहीर करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महायुती सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून समृद्धी महामार्गासह राज्यातील सर्व मोठ्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका जाहीर…

1 तास ago

विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा चोरणाऱ्या सराईत टोळीचा अखेर पर्दाफाश!

शिरूर डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी; दोन आरोपी जेरबंद, १८ गुन्ह्यांची उकल, ३०० किलो तांब्याच्या तारा…

1 तास ago

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन गावठी पिस्तुलांसह पंधरा जिवंत काडतुसे जप्त

यवत (प्रतिनिधी) अवैध अग्निशस्त्रांचा वापर करून गुन्हे करण्याच्या शक्यतेला आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून विशेष…

6 तास ago

रांजणगाव गणपतीत ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई; कोंढापुरी तलावात चासकमानचे पाणी सोडा; शेखर पाचुंदकर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात ऐन पावसाळ्याच्या दिवसांतच पाणीटंचाई निर्माण झाल्याने…

6 तास ago