महाराष्ट्र

महायुती सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले; सर्व मोठ्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका जाहीर करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महायुती सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून समृद्धी महामार्गासह राज्यातील सर्व मोठ्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. समृद्धी महामार्गात २० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत हा पैसा राजकीय पक्ष फोडण्यासाठी वापरल्याचा गंभीर दावा त्यांनी केला.

ज्येष्ठ काँग्रेस नेते मधुकराव चौधरी यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानंतर जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.

मुंबई आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसात शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू, उघड्या मॅनहोलमध्ये पडून नागरिकाचा मृत्यू तसेच इतर घटनांमध्ये १२ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख करत त्यांनी या दुर्घटनांसाठी सरकारच्या भ्रष्ट आणि निष्काळजी कारभाराला जबाबदार धरले. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी पुन्हा केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले की, नाशिकमध्ये ढगफुटी होणार असल्याचे सांगून सरकारने शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली, मात्र प्रत्यक्षात अशी कोणतीही घटना घडली नाही. काँग्रेसचे आंदोलन रोखण्यासाठी सरकारने अफवा पसरवल्याचा आरोपही त्यांनी केला.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर “सर्वात खोटारडे व्यक्ती” असल्याचा आरोप करत वेगळा विदर्भ, धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, तसेच लाडकी बहीण योजनेत २,५०० रुपये देण्याच्या आश्वासनांवरूनही सरकारवर निशाणा साधला.

शरद पवार यांच्या पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सपकाळ म्हणाले की, अशा चर्चांची माहिती त्यांच्याकडे नाही. मात्र, भाजपाविरोधात लढणाऱ्या सर्व पक्षांनी एकत्र येणे ही काँग्रेसची भूमिका असून देशात भाजपाला सक्षम पर्याय म्हणून काँग्रेसच उभी राहू शकते, असा दावा त्यांनी केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संगमनेरसाठी स्वतंत्र RTOच्या मागणीला वेग; मंत्री सरनाईकांकडून प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश

मुंबई: संगमनेरसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) स्थापनेच्या मागणीला पुन्हा गती मिळाली आहे. यासाठी आमदार…

1 तास ago

MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत उपोषण; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षा CBT (Computer Based Test) पद्धतीने घेण्याच्या आणि Normalization…

1 तास ago

‘व्हीबी-जीरामजी’मुळे ग्रामीण विकासाला नवी गती; रोजगार हमीचे १२५ दिवस, ३१८ कामांचा समावेश

मुंबई: विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात बुधवारी 'विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण)…

1 तास ago

विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा चोरणाऱ्या सराईत टोळीचा अखेर पर्दाफाश!

शिरूर डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी; दोन आरोपी जेरबंद, १८ गुन्ह्यांची उकल, ३०० किलो तांब्याच्या तारा…

1 तास ago

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन गावठी पिस्तुलांसह पंधरा जिवंत काडतुसे जप्त

यवत (प्रतिनिधी) अवैध अग्निशस्त्रांचा वापर करून गुन्हे करण्याच्या शक्यतेला आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून विशेष…

6 तास ago

रांजणगाव गणपतीत ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई; कोंढापुरी तलावात चासकमानचे पाणी सोडा; शेखर पाचुंदकर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात ऐन पावसाळ्याच्या दिवसांतच पाणीटंचाई निर्माण झाल्याने…

6 तास ago