महाराष्ट्र

आंबेडकर उद्यानाच्या वाढीव जागेऐवजी उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची मागणी; नोवेल साळवेंचे आवाहन

कल्याण : कल्याण पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी वाढीव जागा मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व नेत्यांचे अभिनंदन करतानाच, उद्यानालगतच्या जागेवर उपजिल्हा मध्यवर्ती रुग्णालय उभारण्याची मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नोवेल साळवे यांनी केली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवा मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी शासकीय उपजिल्हा मध्यवर्ती रुग्णालय उभारल्यास नागरिकांना उपचारासाठी मुंबईकडे धाव घेण्याची गरज कमी होईल, असे साळवे यांनी म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या उद्यानाच्या जागेबाबत कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, या जागेच्या बाजूची जागा रुग्णालयासाठी उपलब्ध करून दिल्यास त्याचा लाभ सर्व जाती-धर्मातील नागरिकांना होईल. मानवतेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेणे हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल, अशी भूमिका साळवे यांनी मांडली.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज असते तर त्यांनी उद्यानापेक्षा सर्वसामान्य नागरिकांना उपचार मिळतील अशा रुग्णालयाला प्राधान्य दिले असते,” असे मतही त्यांनी व्यक्त केले.

आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन कल्याणमध्ये शासकीय उपजिल्हा मध्यवर्ती रुग्णालय उभारण्यासाठी सर्व सामाजिक कार्यकर्ते, नेते आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन नोवेल साळवे यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दररोज च्यवनप्राश खाण्याचे फायदे आणि तोटे तुम्हाला माहिती आहेत का

च्यवनप्राश एक प्राचीन आयुर्वेदिक औषध आहे. ज्याचे शतकानुशतके भारतीय घरांमध्ये सेवन केले जात आहे. हा…

38 मिनिटे ago

‘मोदींनी चहा कुठे विकला?’; संजय राऊतांचा फडणवीसांसह भाजपवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चहावाला’ या राजकीय प्रतिमेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते…

1 तास ago

२२ वर्षांच्या आकडेवारीचा सरकारसमोर आरसा; देश पुढे गेला, पण सामान्य माणसाचे आयुष्य किती बदलले?

मुंबई : देशाचा विकास नेमका कोणत्या निकषांवर मोजायचा, यावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक चर्चा…

1 तास ago

बळीराजा, महिला आणि तरुणांसाठी महायुती सरकार कटिबद्ध; कर्जमाफीचा शब्द टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार; एकनाथ शिंदे

मुंबई: शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत महायुती सरकार काम करत आहे. “महाराष्ट्राच्या…

15 तास ago

घाटकोपरच्या रामजीनगरातील तुंबलेल्या शौचालयांवरून महापालिकेला धारेवर; महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न

मुंबई : घाटकोपर पश्चिमेतील रामजीनगर परिसरातील तुंबलेली सार्वजनिक शौचालये, अस्वच्छता आणि प्रचंड दुर्गंधीमुळे स्थानिक महिलांना मोठ्या…

18 तास ago

नाशिकमध्ये काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण; समारोपाला राहुल गांधींची उपस्थिती

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानांतर्गत’ निवड झालेल्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांच्या १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आज…

18 तास ago