आरोग्य

दररोज च्यवनप्राश खाण्याचे फायदे आणि तोटे तुम्हाला माहिती आहेत का

च्यवनप्राश एक प्राचीन आयुर्वेदिक औषध आहे. ज्याचे शतकानुशतके भारतीय घरांमध्ये सेवन केले जात आहे. हा गडद, ​​चिकट पदार्थ प्रामुख्याने आवळा आणि औषधी वनस्पती व मसाल्यांच्या मिश्रणापासून बनवला जातो. च्यवनप्राशच्या आरोग्य फायद्यांमुळे हल्ली लोक पुन्हा मोठ्या प्रमाणात त्याचे सेवन करू लागले आहेत. पण, जेव्हा तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत च्यवनप्राशचा समावेश करता तेव्हा तुमच्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो.

पारंपरिक औषधी असलेल्या आयुर्वेदिक च्यवनप्राशचे दररोज सेवन केल्याने व्यक्तीच्या एकूण पोषण आहारावर सकारात्मक परिणाम होतो. च्यवनप्राशमधील आवळा हा क जीवनसत्त्वाचा समृद्ध स्रोत आहे. आवळा रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतो आणि महत्त्वपूर्ण अँटिऑक्सिडंट्सचे फायदे प्रदान करतो. तसेच च्यवनप्राशमधील आले, दालचिनी, वेलची यांसह औषधी वनस्पती व मसाल्यांचे मिश्रण पचनास मदत करते आणि चयापचय कार्ये वाढवते. त्याव्यतिरिक्त च्यवनप्राशमध्ये अ व ई ही जीवनसत्त्वे, कॅल्शियम व लोह यांसारखे आवश्यक पोषक घटक असतात, जे एकूण पोषण संतुलनात योगदान देतात.

अश्वगंधा व शतावरी यांसारख्या ॲप्टोजेनिक औषधी वनस्पती ताण कमी करण्यास मदत करतात आणि उर्जा वाढवतात. फॉर्म्युलेशनमधील मध व तुपाची उपस्थिती पोषक घटक शोषणास मदत करते आणि निरोगी चरबीचा स्रोत प्रदान करते. परंतु, यातील साखरेमुळे “अत्याधिक कॅलरीचे सेवन टाळण्याकरिता संयम ठेवणे गरजेचे आहे.” “च्यवनप्राश संतुलित आहारासाठी, रोगप्रतिकार शक्ती, पचनशक्ती आणि सर्वसाधारणपणे शरीराचे सामान्यत: कल्याण साधण्यासाठी एक मौल्यवान जोड असू शकते.”

च्यवनप्राश खाण्याचे फायदे

सुषमा यांच्या म्हणण्यानुसार, च्यवनप्राश नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्तीला अनेक विशिष्ट फायदे प्रदान करते.

व्हिटॅमिन सी समृद्ध करते

च्यवनप्राशमधील प्राथमिक घटक आवळा आहे, ज्यामध्ये क जीवनसत्त्वाचे प्रमाण अपवादात्मकपणे जास्त आहे. हे जीवनसत्त्व रोगप्रतिकार शक्तीच्या योग्य कार्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, ज्यामुळे संक्रमणांपासून बचाव करण्याची शरीराची क्षमता वाढविण्यास मदत होते.

अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म

च्यवनप्राशमध्ये अश्वगंधा, तुळशी व पिंपळी यांसारख्या विविध प्रकारच्या अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध औषधी वनस्पती आणि मसाले असतात. अँटिऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सला तटस्थ करण्यात मदत करतात, ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात आणि रोगप्रतिकारक पेशींचे संरक्षण करतात.

पांढऱ्या रक्तपेशींच्या कार्यक्षमतेत वाढ

गिलॉय आणि शतावरी सारखे घटक पांढऱ्या रक्तपेशींची क्रियाशीलता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी ओळखले जातात, जे रोगप्रतिकारकतेच्या प्रतिसादासाठी आवश्यक आहेत.

निरोगी रोगप्रतिकार शक्ती

हळद, आले व च्यवनप्राशमधील इतर घटकांचे दाहकविरोधी गुणधर्म शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात आणि निरोगी रोगप्रतिकारक प्रतिसादास समर्थन देतात.

प्रतिजैविक गुणधर्म

मध आणि कडुलिंब यांसारख्या घटकांमध्ये नैसर्गिक प्रतिजैविक गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराला जीवाणू, विषाणू व बुरशीजन्य संसर्गाचा सामना करण्यास मदत मिळते.

आतड्यांचे आरोग्य सुधारते 

मजबूत रोगप्रतिकार शक्तीसाठी निरोगी पचनसंस्था महत्त्वाची आहे. आले आणि दालचिनीसारखे घटक पचनास मदत करतात आणि संतुलित आतड्यांतील मायक्रोबायोम राखण्यास मदत करतात, जे रोगप्रतिकार शक्तीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मोदींनी चहा कुठे विकला?’; संजय राऊतांचा फडणवीसांसह भाजपवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चहावाला’ या राजकीय प्रतिमेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते…

2 तास ago

२२ वर्षांच्या आकडेवारीचा सरकारसमोर आरसा; देश पुढे गेला, पण सामान्य माणसाचे आयुष्य किती बदलले?

मुंबई : देशाचा विकास नेमका कोणत्या निकषांवर मोजायचा, यावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक चर्चा…

2 तास ago

आंबेडकर उद्यानाच्या वाढीव जागेऐवजी उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची मागणी; नोवेल साळवेंचे आवाहन

कल्याण : कल्याण पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी वाढीव जागा मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या…

2 तास ago

बळीराजा, महिला आणि तरुणांसाठी महायुती सरकार कटिबद्ध; कर्जमाफीचा शब्द टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार; एकनाथ शिंदे

मुंबई: शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत महायुती सरकार काम करत आहे. “महाराष्ट्राच्या…

16 तास ago

घाटकोपरच्या रामजीनगरातील तुंबलेल्या शौचालयांवरून महापालिकेला धारेवर; महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न

मुंबई : घाटकोपर पश्चिमेतील रामजीनगर परिसरातील तुंबलेली सार्वजनिक शौचालये, अस्वच्छता आणि प्रचंड दुर्गंधीमुळे स्थानिक महिलांना मोठ्या…

19 तास ago

नाशिकमध्ये काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण; समारोपाला राहुल गांधींची उपस्थिती

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानांतर्गत’ निवड झालेल्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांच्या १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आज…

19 तास ago