मुंबई: सालाबादप्रमाणे यावर्षीही मुलुंड विभागात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला कार्यवाह भाग्यश्री नूलकर यांनी पुष्पहार अर्पण करून केली.
यानंतर महेश कवटकर यांनी साहित्य संमेलनातील अनुभव कथन करत उपस्थितांना साहित्यविश्वातील काही रोचक क्षणांची सफर घडवली. दीनानाथ भिडे यांनी वर्ष २०२५ मध्ये वाचलेल्या निवडक दिवाळी अंकांतील लेखांचे सोप्या आणि रसाळ भाषेत विवेचन केले.
लक्ष्मण उपाध्ये यांनी मराठी भाषेशी निगडीत दैनंदिन जीवनातील ठळक विसंगती खुमासदार शैलीत मांडत उपस्थितांची दाद मिळवली. पुढे अस्मिता सुतार, रजनी साळुंखे आणि उल्हास कुळकर्णी यांनी कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचे भावपूर्ण वाचन केले. शरयू वैद्य यांनी आपल्या काही आठवणी शेअर करत वातावरण अधिक जिवंत केले.
विजया कापडी यांनी ज्ञानपीठ पुरस्कार या प्रतिष्ठित साहित्यमानाच्या स्वरूपाविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात शुभागी सिनकर यांनी कुसुमाग्रजांचे गीत सादर केले, ज्याला उपस्थित श्रोत्यांनी उत्स्फूर्त साथ दिली.
त्यानंतर चिन्मय मायदेव यांनी लेख वाचनासह महाराष्ट्रावर आधारित पोवाडा सादर करत कार्यक्रमाची सांगता रंगतदार पद्धतीने केली. शेवटी भाग्यश्री नूलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंत गोळे व कर्मचारीवर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…
नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…