मुंबई: सालाबादप्रमाणे यावर्षीही मुलुंड विभागात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला कार्यवाह भाग्यश्री नूलकर यांनी पुष्पहार अर्पण करून केली.
यानंतर महेश कवटकर यांनी साहित्य संमेलनातील अनुभव कथन करत उपस्थितांना साहित्यविश्वातील काही रोचक क्षणांची सफर घडवली. दीनानाथ भिडे यांनी वर्ष २०२५ मध्ये वाचलेल्या निवडक दिवाळी अंकांतील लेखांचे सोप्या आणि रसाळ भाषेत विवेचन केले.
लक्ष्मण उपाध्ये यांनी मराठी भाषेशी निगडीत दैनंदिन जीवनातील ठळक विसंगती खुमासदार शैलीत मांडत उपस्थितांची दाद मिळवली. पुढे अस्मिता सुतार, रजनी साळुंखे आणि उल्हास कुळकर्णी यांनी कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचे भावपूर्ण वाचन केले. शरयू वैद्य यांनी आपल्या काही आठवणी शेअर करत वातावरण अधिक जिवंत केले.
विजया कापडी यांनी ज्ञानपीठ पुरस्कार या प्रतिष्ठित साहित्यमानाच्या स्वरूपाविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात शुभागी सिनकर यांनी कुसुमाग्रजांचे गीत सादर केले, ज्याला उपस्थित श्रोत्यांनी उत्स्फूर्त साथ दिली.
त्यानंतर चिन्मय मायदेव यांनी लेख वाचनासह महाराष्ट्रावर आधारित पोवाडा सादर करत कार्यक्रमाची सांगता रंगतदार पद्धतीने केली. शेवटी भाग्यश्री नूलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंत गोळे व कर्मचारीवर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…