मुंबई: आपल्या जमिनीच्या आत काही मौल्यवान वस्तू सापडल्या तर त्या आपल्याच असतील का? नाही. भारतीय कायद्यांनुसार, जमिनीत सापडलेला कोणताही खजिना हा सरकारचा असतो. जाणून घ्या यासंदर्भातील कायदा.
भारतीय निखात-निधी अधिनियम, 1878′ काय सांगतो?
‘Indian Treasure-Trove Act, 1878’ (Amending Act XII of 1891) हा कायदा भारतात लागू आहे. यातील ‘Treasure Trove’ हा शब्द फ्रेंच भाषेतील असून, याचा अर्थ “सापडलेला खजिना” असा होतो.
मराठीत हा कायदा ‘भारतीय निखात-निधी अधिनियम 1878’ म्हणून ओळखला जातो. यातील ‘निखात’ म्हणजे मृदेमध्ये (मातीत) दडलेला कोणताही मौल्यवान जिन्नस होय.
या कायद्यानुसार महत्त्वाचे नियम:
जमिनीत सापडलेल्या कोणत्याही मौल्यवान वस्तूंना ‘खजिना’ म्हणतात.
जर त्याची किंमत ₹10 पेक्षा जास्त असेल, तर जिल्हाधिकारी किंवा स्थानिक प्रशासनाला त्वरित माहिती देणे बंधनकारक आहे.
कायद्याचे उल्लंघन केल्यास दंड किंवा 1 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.
हा गुन्हा दखलपात्र (Cognizable) आणि अजामीनपात्र (Non-bailable) आहे.
जमिनीच्या 3.5 फूट खालच्या मालकीचा नियम
काही माहितीस्त्रोतांनुसार, जमिनीचा सातबारा जरी तुमच्या नावावर असला तरी, 3.5 फूट खोलीनंतरची जमीन ही सरकारची मानली जाते. याचा अर्थ जर तुम्हाला खोल जमिनीत काही मौल्यवान वस्तू, खजिना किंवा नैसर्गिक संपत्ती (उदा. सोनं, खनिजे) सापडली, तर त्यावर तुमचा हक्क नसून ती सरकारी मालमत्ता ठरते. म्हणूनच, जर तुम्हाला जमिनीत काही मौल्यवान वस्तू सापडल्या तर योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेचे पालन करा आणि कोणत्याही अडचणी टाळा.
मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…
मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…
शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…