महाराष्ट्र

तूर-हरभरा खरेदीला मुदतवाढ; हरभरा खरेदीचे उद्दिष्टही वाढले

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देत केंद्र शासनाने खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ दिली आहे. तसेच हरभरा खरेदीच्या उद्दिष्टात 58 हजार 632 मेट्रिक टनांची वाढ करण्यात आली असून आता राज्यात एकूण 8 लाख 19 हजार 882 मेट्रिक टन हरभरा खरेदी करता येणार आहे, अशी माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्य शासनाच्या मागणीनुसार तूर खरेदीची मुदत 31 मे 2026 पर्यंत तर हरभरा खरेदीची मुदत 29 मे 2026 पर्यंत वाढवून दिली आहे. तसेच हरभरा खरेदीसाठी अतिरिक्त उद्दिष्ट मंजूर केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे मंत्री जयकुमार रावल यांनी आभार मानले.

मंत्री रावल म्हणाले की, सुरुवातीला केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत तूर खरेदीसाठी 90 दिवसांचा तर हरभरा खरेदीसाठी 60 दिवसांचा कालावधी मंजूर करण्यात आला होता. मात्र राज्यातील शेतकऱ्यांकडून मुदतवाढीची सातत्याने मागणी होत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पणन विभागाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून ही मुदतवाढ मिळवून दिली.

किमान हमीभाव योजनेअंतर्गत तूर खरेदीला 1 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात झाली असून 1 मेपर्यंत असलेली मुदत आता 31 मे 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. खरीप हंगाम 2025-26 साठी राज्याला 3 लाख 37 हजार मेट्रिक टन तूर खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत 37 हजार 801 शेतकऱ्यांकडून 6 लाख 82 हजार 37 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.

हरभरा खरेदीला 1 मार्च 2026 पासून सुरुवात झाली होती. आधी 29 एप्रिलपर्यंत असलेली मुदत आता 29 मे 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. हरभरा खरेदीसाठी सुरुवातीला 7 लाख 61 हजार 250 मेट्रिक टन उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात आणखी 58 हजार 632 मेट्रिक टन वाढ करून एकूण उद्दिष्ट 8 लाख 19 हजार 882 मेट्रिक टन करण्यात आले आहे. आतापर्यंत 3 लाख 7 हजार 973 शेतकऱ्यांकडून 76 लाख 12 हजार 499 क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.केंद्रीय कृषी मंत्रालयाने तूर व हरभरा खरेदीसाठी नवीन तसेच एकदा वापरलेल्या लहान B-Twill ज्यूट पिशव्यांच्या वापरासही परवानगी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात खरेदी संस्थांच्या माध्यमातून तूर व हरभरा खरेदी पारदर्शकपणे सुरू असून शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा केले जात आहेत. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी संबंधित यंत्रणेला वेळोवेळी सूचना देण्यात आल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मेंदूचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आहारात काही खास पदार्थांचा समावेश करा

सध्याच्या काळात धावपळीची जीवनशैली, कामाचा ताण आदी गोष्टींमुळे लोकांना आरोग्य आणि आहाराकडे पुरेसं लक्ष देता…

2 तास ago

जेवणानंतर तुम्हीसुद्धा ही चूक करता का

हल्ली युरीक ॲसिड, वजन, काेलेस्ट्रॉल वाढलेल्या व्यक्तींची आकडेवारी खूप दिसून येते. अगदी कमी वयातच अनेकांना…

2 तास ago

सकाळी मुलांना झोपेतून तुम्ही कसं उठवता, करा या ५ गोष्टी, मुलं हाेतील तल्लख आणि आनंदी

ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आनंदी राहणं आणि पॉझिटिव्ह एनर्जी ठेवणं फार महत्वाचे असते. जर तुमचं मुल सकाळी…

2 तास ago

एमएसएफडीएच्या नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण; उच्च शिक्षण क्षेत्राला डिजिटल बळ

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए) च्या नव्या सुधारित…

2 तास ago

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘मानससूत्र’ उपक्रम; अध्यापकांना संवेदनशील बनविण्यावर भर

मुंबई: विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी आणि अध्यापकांना अधिक संवेदनशील व सक्षम बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य…

2 तास ago

‘यूजी 4.0’मुळे अध्यापक बदलत्या शिक्षण व्यवस्थेशी सुसंगत होतील; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अध्यापकांना बदलत्या शैक्षणिक प्रणालीशी सुसंगत…

2 तास ago