CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 100?
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या प्रभावामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने सर्वसमावेशक विशेष दुष्काळ निवारण पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात धीरज देशमुख यांनी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. अपुरा आणि अनियमित पाऊस, भूजल पातळीतील घट तसेच जमिनीत पुरेसा ओलावा न राहिल्याने कोरडवाहू शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. अनेक भागांत पेरण्या रखडल्या असून, उभी पिकेही धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
या बिकट परिस्थितीत बाधित जिल्ह्यांमध्ये जिल्हा व तालुकास्तरावर तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत आणि आवश्यक त्या ठिकाणी त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.
तसेच बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये डीबीटीद्वारे थेट नुकसानभरपाई जमा करावी, शेती कर्जांचे पुनर्गठन करून व्याजमाफी द्यावी आणि संकटकाळात सुरू असलेली सक्तीची कर्जवसुली तात्काळ स्थगित करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
पावसावर अवलंबून असलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत देण्याबरोबरच पशुधनाच्या संरक्षणासाठी चारा छावण्या आणि चारा बँका तातडीने सुरू कराव्यात, असेही धीरज देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे.
शेतकऱ्यांना केवळ तात्पुरती मदत न देता तातडीची आर्थिक मदत, पीक संरक्षण आणि दीर्घकालीन उपाययोजनांची प्रभावी सांगड घालून सरकारने बळीराजाला संकटातून बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, असा पुनरुच्चार धीरज देशमुख यांनी केला आहे.
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…
पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका…